फोटो सौजन्य- pinterest
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण वेळेअभावी सकाळचा नाश्ता करण्याचे टाळतात. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करणे शरीर आणि मनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सकाळचा नाश्ता हा शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच दिवसभर कार्यक्षम ठेवण्यास मदत करतो. त्याचसोबत सकाळच्या नाश्तामध्ये कॅल्शियम आणि फायबर या घटकांचं अधिक प्रमाण असतं. नाश्ता केल्यानं एकाग्रता वाढण्यास मदत होते. मुलांना खासकरून सकाळच्या नाश्त्याचा भरपूर फायदा होतो.
ऊर्जेसाठी गव्हापासून बनलेली ब्रेड आणि मोड आलेले कडधान्य, प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट, फळं, सुका मेवा, दही खाऊ शकता. हलकं-फुलकं खायचं असेल तर फळं, केळ, पालक, ब्रेड खाऊ शकता.
असे म्हटले जाते की, सकाळी आरोग्यदायी नाश्ता केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि वायू सरणे, आम्लपित्त आणि पोटफुगणे यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. नाश्त्यामध्ये आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील उर्जेची पातळी टिकून राहण्यास मदत होते. आरोग्यदायी पदार्थ तुम्हाला वारंवार लागणारी भूक टाळण्यासाठी मदत करतात आणि तुमच्या आतड्यांध्ये असलेले सूक्ष्मजीवांचे सुंतलन सुधारण्यास मदत करते. आरोग्यदायी नाश्त्यामुळे तुमच्या चयापचयाला चालना मिळते.
रिकाम्या पोटी चहा आणि बिस्कीटे खाणे. चहामध्ये कॅफिन असते त्यामुळे तो रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडीटी वाढू शकते. तर बिस्कीटांमध्ये रिफाईंड पीठ, रिफाईंड साखर आणि पाम तेल यांसारखे प्रक्रिया केलेले घटक असतात. यामुळे आतड्यांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
पांढऱ्या किंवा तपकिरी ब्रेडमध्ये बऱ्याचदा प्रक्रियायुक्त पीठ आणि पदार्थ टिकवणाऱ्या घटकांचा समावेश केलेला असतो. जॅममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. या मिश्रणामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते आणि पुन्हा लगेच भूक लागू शकते.
मेदू, वडापाव, समोसा, जंक पूड, कचोरी इत्यादी सारखे तळलेले पदार्थ सकाळी खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. यामुळे पोटफुगीचा त्रास होण्याची शक्यता असते.
फक्त फळ किंवा फळांचा रस प्यायल्याने शरीराला पुरेसे प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी मिळत नाही. यामुळे पुन्हा भूक लागण्याची शक्यता असते. त्यासोबतच साखरेच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असते.
त्यासोबतच फायबर, प्रोबायोटिक्स घटक असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा. त्यामुळे नाश्त्यामध्ये मूग आणि दह्यांचा समावेश करावा. मूग हे सहज पचणारे कडधान्य आहे. यामध्ये फायबर आणि प्रथिने दोन्हीचे प्रमाण असतात. दही हे प्रोबायोटिक म्हणून आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Ans: रात्रभर उपाशी राहिल्यानंतर शरीराला ऊर्जा आणि पोषणाची गरज असते. सकाळचा नाश्ता शरीर आणि मेंदूला कार्यक्षम ठेवण्यास मदत करतो.
Ans: नाश्ता केल्याने ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो आणि दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत होते.
Ans: थकवा, चिडचिड, कमी एकाग्रता आणि असंतुलित खाण्याच्या सवयी निर्माण होऊ शकतात.






