(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
तुम्हालाही कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रीणींसोबत या बेटाला भेट द्यायची असेल तर या ठिकाणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. आज आम्ही तुम्हाला या लेखात लक्षद्विपसाठीची पूर्वतयारी आणि इतर सर्व माहिती पुरवत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ट्रीपचे एक योग्य प्लॅनिंग करु शकता. चला सविस्तर जाणून घेऊया.
लक्षद्वीपला भेट देण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती आहे?
एप्रिल ते मे दरम्यानचा काळ लक्षद्विपला भेट देण्यासाठी एक सर्वाेत्तम काळ मानला जातो. याकाळात उष्णता आणि दमटपणा वातावरणात असते ज्यामुळे बेटाचे सुंदर वातावरण आपल्याला वेगळ्या जगात घेऊन गेल्याचा अनुभव देते. हा काळ जलक्रिडांसाठी उत्तम मानला जातो. समुद्राचे पाणीही स्वच्छ असते ज्यामुळे स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि कयाकिंग यांसारख्या खेळांचा आरामात आनंद घेता येतो. याकाळात वातावरण २७°C ते ३२°C पर्यंत असते, जे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी उत्तम आहे.
पावसाळ्यात प्रवास का करू नये?
जून ते सप्टेंबर हा कालावधीत मुसळधार पाऊस पडतो ज्यामुळे समुद्र याकाळात भरपूर खवळतो. उंच लाटा आणि खराब हवामानामुळे अनेकदा लक्षद्विपवर प्रवास आणि जलक्रीडा करण्यावर निर्बंध लावण्यात येतात. तुम्ही जर पहिल्यांदाच लक्षद्वपला भेट देत असाल तर पावसाळ्यात या ठिकाणी जाणं टाळा.
प्रवासाला निघण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
हे लक्षात घ्या की लक्षद्विपला जाण्यासाठी नियोजनाची नितांत गरज पडते. इथे प्रत्येकाला थेट प्रवेश दिला जात नाही. यासाठी परवानगी आवश्यक असते. सुदैवाने ही प्रकिया आता सोपी झाली आहे ज्यामुळे जुन्या पोलीस पडताळणी (PCC) प्रक्रियेचा त्रास दूर झाला आहे. पर्यटकांना इथे प्रवेश मर्यादित असल्याने तुम्ही आधीच हाॅटेल बुकिंग करुन घ्या. ऐनवेळी सहलीचे नियोजन अनेक अडचणींना जन्म देऊ शकते.
Mini Thailand Of India : हिरवळ, धबधबा आणि शांतता… भारतातील मिनी थायलंड कुठे आहे माहिती आहे का?
हे अजिबात विसरू नका
लक्षद्विपला वातावरण उष्णकटिबंधीय आहे ज्यामुळे तिथे फार जड आणि गरम कपडे घेऊन जाऊ नका. आपल्यासोबत हलके सुती कपडे, सनस्क्रीन, सनग्लासेस आणि टोपी, गाॅगल घेऊन जा. इथे तुम्ही पाण्याचे खेळ खेळत असाल तर सोबत अतिरिक्त कपडे आणि वाॅटर बॅग्स घेऊन जा.






