आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'या' पदार्थांमुळे वाढतो पित्ताचा त्रास, जाणून घ्या पदार्थ खाण्याची योग्य पद्धत
कोणत्या पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढते?
पित्त वाढवणारे पदार्थ कोणते?
आलं खाण्याची योग्य पद्धत?
दैनंदिन आहारात सतत वेगवेगळे पदार्थांचे कायमच सेवन केले जाते. कधी तिखट तर आंबटगोड पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. आहारात खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा शरीरावर थेट परिणाम होतो. त्यामुळे काहीवेळा आवडीचे पदार्थ बेताने खाणे आवश्यक आहे. काहींना रोजच्या आहारात सतत तिखट, जंक फूड, तेलकट पदार्थ खाण्याची खूप जास्त आवड असते. पण चुकीच्या पदार्थ तिखट तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे पित्ताचा त्रास होतो, तोंडाला फोड येणे, ऍसिडिटी, जळजळ, डोकेदुखी इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. याशिवाय ज्यांच्या शरीरात कायमच पित्त दोषाची समस्या उद्भवते, त्यांनी आहारात तिखट आणि तेलकट पदार्थ बेताने खावेत. आज आम्ही तुम्हाला आवडीने खाल्लेल्या कोणत्या पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
गोड चवीची पपई खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पपई पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये उष्णता जास्त असते.शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे बऱ्याचदा मासिक पाळी सुद्धा लवकर येते. त्यामुळे जास्त प्रमाणात पपईचे सेवन करणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. अतिप्रमाणात किंवा रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यास शरीरात पित्त वाढते. नैसर्गिक गोडवा असलेली पपई त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे पपई योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खावी. याशिवाय ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे, अशांनी पपईचे सेवन अजिबात करू नये. यामुळे आरोग्य बिघडू शकते.
शेंगदाणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानले जातात. पण या पदार्थामध्ये पित्त वाढवण्याची क्षमता असते. अतिप्रमाणात किंवा पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी शेंगदाणे खाल्ल्यास पित्ताचा त्रास वाढून ऍसिडिटी होईल. त्यामुळे शेंगदाणे कच्चे किंवा भाजल्यानंतर त्याच्या पुढील टोक काढून खावे. कारण या भागात जास्त प्रमाणात पित्त असते. पित्ताचा त्रास वाढल्यानंतर ऍसिडिटी किंवा मळमळ, उलट्या होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शेंगदाणे शिजवून खावेत.
स्वयंपाक घरात आल्याचा खूप जास्त वापर केला जातो. आलं खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, खाल्ले पचन होत पण आल्यात खूप जास्त उष्णता असते. आल्याचे सेवन करणे शरीरासाठी जितके चांगले आहे, तितकेच वाईट सुद्धा आहे. त्यामुळे आलं खाताना अतिशय कमी प्रमाणात खावे. आल्यासोबत गूळ किंवा मध किंवा ताक घेतल्यास त्याचे दाहक परिणाम कमी होतात आणि आरोग्य सुधारते. किसून घेतलेलं आलं खाताना त्यात मीठ टाकावे. यामुळे ऍसिडिटी वाढत नाही.
Ans: दूध आणि फळे एकत्र खाणे, दही आणि मासे किंवा मांस यांचे सेवन.
Ans: पोटात सूज , गॅस, आणि अपचनासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Ans: भरपूर प्रथिने आणि कर्बोदके एकाच वेळी खाणे टाळावे.






