केस गळती रोखण्याचे उपाय (फोटो- istockphoto)
केसांचे गळणे आणि पांढरे होणे त्रासदायक
कमी वयातच अनेकांना सुरू आहे त्रास
घरगुती उपाय करून होऊ शकते मात
सध्या प्रत्येकाची जीवनशैली ही अत्यंत धावपळीची झाली आहे. धावपळीचे जीवन झाल्यामुळे जेवणाच्या वेळा, झोपायची वेळ सर्व काही बदलले गेले आहे. त्याचा परिणाम आपल्याला आपल्या आरोग्यावर होताना दिसून येतो. त्यातच (Lifestyle News) आपल्या केसांवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे दिसते. आजच्या काळात केस पांढरे होणे आणि गळणे हे सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र ते कमी करण्यासाठी आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत.
प्रदूषण, चुकीची जीवनशैली यामुळे केसांचे गळणे आणि पांढरे होणे हा त्रास होऊ शकतो. काही घरगुती उपाय करून देखील आपण त्यावर मात करू शकतो. बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक उत्पादनाऐवजी तुम्ही जवसाच्या बिया देखील वापरू शकता. जवस बिया वापरल्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास फायदा होतो.
सुंदर, घनदाट आणि काळे केस सर्वांना हवे असतात. मात्र बदलत्या हवामानामुळे केसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. केस विंचरताना केस कंगव्यात अडकत असतील तर ही त्रासदायक गोष्ट होऊ शकते. हे रोखण्यासाठी जवसाच्या बिया तुम्ही वापरू शकता. जवसाच्या बिया केसांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
जवस का आहे खास?
जवसांच्या बियांमध्ये ओमेगा – 3 फॅटी असिड, विटॅमिन ई तसेच फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ओमेगा 3 टाळूला पोषण देते. केसांची मुळे मजबूत करते. केसांची चमक वाढण्यास मदत होते.
हेअर मास्क कसा तयार करावा?
जवसाचे जेल तयार करणे अत्यंत सोपे आहे. एक कप पाण्यात दोन चमचे जवसाच्या बिया मिसळून मंद आचेवर उकळावे. ते मिश्रण जेल सारखे होईपर्यंत उकळावे.
वापरावे कसे?
या जेलमध्ये एक चमचा नारळ तेल मिसळावे. हे मिश्रण केसांच्या मुळापर्यन्त लावावे. मॉलिश करावे. 30 ते 40 मिनिटे ते केसांना लावून ठेवावे. नंतर केस धुवावेत. त्यामुळे केस गळणे व पांढ होण्यापासून मदत होऊ शकते.
चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब
‘या’ पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप
केसगळती थांबवून, केसांची वाढ भराभर होण्यासाठी कायमच केमिकल युक्त हेअर सीरम किंवा शाम्पूचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि केस लांबलचक होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या आयुर्वेदिक पदार्थाचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि टाळूवरील इन्फेक्शन कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आयुर्वेदामध्ये केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अश्वगंधा वापरण्याचा सल्ला दिला जातो. अश्वगंधाला ‘वनस्पतींचा राजा’ मानले जाते. केसांचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. यामुळे केसांची मूळ मजबूत होतात.






