अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड
Oceanographic Research 2026: धोक्याची घंटा! हिंद महासागरात वाहतेय गोडे पाणी, शास्त्रज्ञ चिंतेत
याशिवाय बदललेली जीवनशैली, उशिरा विवाह आणि उशिरा गर्भधारणा यामुळेही जोखीम वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे नोकरी आणि करिअरच्या धावपळीमुळे अनेक महिला गर्भधारणा पुढे ढकलतात. वाढत्या वयानुसार गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत महिलांमध्ये हे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. कायद्यानुसार काही विशिष्ट परिस्थितीमध्ये गर्भपातास परवानगी आहे. यात आईच्या
जीवाला धोका निर्माण होणे, गर्भातील गंभीर विकृती, अत्याचारामुळे झालेली गर्भधारणा, गर्भनिरोधक साधनांच्या अपयशामुळे झालेली गर्भधारणा किंवा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अशा कारणांचा समावेश होतो. एकूणच, वाढते गर्भपात प्रमाण हे केवळ वैयक्तिक निर्णयांपुरते मर्यादित नसून सामाजिक, आरोग्यविषयक आणि लोकसंख्यात्मक परिणामांची जाणीव करून देणारे आहे.
Eye Infection Cases: ‘आयुष्मान’ अंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर नऊ जणांनी गमावली दृष्टी
नैसर्गिक गर्भपात देखील चिंताजनक आहे. पहिल्या तीन महिन्यात अधिक प्रमाण आहे. हार्मोनल असंतुलन, जीवनशैलीतील बदल, ताणतणाव महत्त्वाचा घटक हे कारणे नैसर्गिक गर्भपातासाठी कारणीभूत ठरतात. तज्ज्ञांच्या मते गर्भपात वाढ आणि घटते लिंग प्रमाण यांचा संबंध तपासण्याची गरज आहे. जिल्ह्यात हजार मुलीमागे ९६५ मुली इतके लिंग गुणोत्तर आहे. अवैधरित्या गर्भपात केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. जिल्ह्यात जुलै २०२५ मध्ये एका रुग्णालयावर अशा प्रकाराची कारवाई करण्यात आली आहे.
बहुतेक गर्भपात हे वैद्यकीय कारणामुळे करये लागतात. महिलांनी गर्भधारणा उशिरा करण्याऐवजी नियोजनबद्ध पद्धतीने तपासण्या करून निर्णय घ्यावा, नियमित तपासणी आणि वौम्य सल्ला घ्यावा, -डॉ. अरुण साळुंके, एसीएस, डफरीन






