पर्यटन स्थळांचा वविकस केला जाणार (फोटो- ai gemini)
राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्यात येणार
राज्यातील ५० पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार
प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार
मुंबई: राज्यात पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक स्थळे आहेत. या साधन संपत्तीचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून योग्य उपयोग करून राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देण्यात येणार असून विकसित महाराष्ट्र २०४७ चा संकल्प लक्षात घेऊन प्रादेशिक पर्यटन योजनेतून राज्यातील ५० पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे.
या योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत दिली. नियम ९२ अन्वये विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उजनी धरण परिसराचा पर्यटन विकास या विषयी अर्धा तास चर्चा उपस्थित केली.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, महाराष्ट्रराज्यात मोठ्या प्रमाणावर जलस्रोत, विस्तीर्ण समुद्रकिनारा, ऐतिहासिक गड-किल्ले आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसेच अनेक जागतिक वारसा स्थळे, धार्मिक पर्यटन स्थळे राज्यात आहेत. पर्यटन विकासासाठी जलक्रीडा, वन पर्यटन, वारसा स्थळे आणि धार्मिक पर्यटन हे चार महत्चाचे स्तंभ आहेत. या पर्यटन स्थळांच्या माध्यमातून राज्यात पर्यटकांची संख्या वाढावी आणि पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.
Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
उजनी धरण परिसरात पर्यटन विकास करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उजनी धरण परिसराचा पर्यटन विकास प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. उजनी धरण प्रकल्पावर पर्यटनाच्या कामासाठी जलसंपदा विभागाची नाहरकत आवश्यक असल्याचे सांगत राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, जलसंपदा विभाग, पर्यटन विभाग आणि इतर संबंधित विभागांनी समन्वयाने निर्णय घेतल्यास राज्यातील जलस्रोतांचा पर्यटनासाठी प्रभावी वापर करता येईल. सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणाचा वापर करून पर्यटन प्रकल्पांना गती देण्यात येईल. उजनी धरण प्रकल्पास भेट देऊन या प्रकल्पावर करण्यात येणाऱ्या पर्यटन प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.
सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका
अफगाणिस्तान – तालिबानच्या नियंत्रणाखाली देशातील नागरिक स्वातंत्र्य मोठ्या प्रमाणात मर्यादित झाले आहे. दहशतवादी हल्ले, अचानक हिंसाचार आणि परदेशी नागरिकांच्या अपहरणाचा धोका कायम आहे.
या वर्षी चुकूनही बनवू नका हे देश फिरण्याचा प्लॅन… सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका
सूडान – सैन्य आणि अर्धसैनिक गटांमधील भीषण संघर्षामुळे देशातील परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. मूलभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या असून कायदा-सुव्यवस्था जवळपास अस्तित्वात नाही.
यमन – अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे आणि मानवी संकटामुळे यमन हा जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक ठरला आहे. हूती बंडखोरांच्या हालचाली आणि प्रादेशिक तणावामुळे विमानसेवाही धोक्यात आहे.






