(फोटो सौजन्य-AI एआय)
Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
सोयाबीन, तूर आणि अन्य पिकांवरही पावसातील अनियमिततेचा परिणाम सोयाबीन आणि कडधान्य पिकांवरही होत आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या फवारणीवर भर न देता शेताची नियमित पाहणी, तण नियंत्रण, योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक संरक्षणाच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
फवारणीच्या फेऱ्या वाढल्या; खर्चाचा भार : किडीचा प्रादुर्भाव दिसताच अनेक शेतकरी कीटकनाशकांच्या फवारण्या करीत आहेत. काही शेतांमध्ये एकापेक्षा अधिक फेऱ्या झाल्याचे शेतकरी सांगतात. महागड्या कीटकनाशकांमुळे उत्पादन खर्च वाढत आहे.
कपाशी आणि सोयाबीनसारख्या मोठ्या क्षेत्रावरील पिकांवर फवारणी करण्यासाठी मजूर मिळणेही शेतकऱ्यांसमोरचे मोठे आव्हान आहे. फवारणीच्या हंगामात एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांना मजुरांची आवश्यकता भासत असल्याने उपलब्ध मजुरांवर ताण येतो. त्यामुळे काही भागांत ड्रोनद्वारे फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.
८८ किडीचा प्रादुर्भाव दिसताच सरसकट रासायनिक फवारणी करण्याऐवजी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करावी, प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी, अनावश्यक फवारण्या टाळाव्यात आणि शिफारशीत कीटकनाशकांचा योग्य मात्रेत वापर करावा.






