फोटो सौजन्य - Social Media
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ७२ हजार १२८ शेतकऱ्यांपैकी ३३ हजार ११३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीकविमा काढला असून, २२ हजार ६६० हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मिळून २ कोटी ६७ लाख रुपयांचा प्रीमियम भरला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता 10 क्षेत्रीय कार्यालये; 30 स्वीकृत सदस्यपदांसाठी भाजपमध्ये चुरस
राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी सुरू केलेली ‘एक रुपयात पीकविमा योजना’ बंद झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना पिकानुसार निश्चित करण्यात आलेला प्रीमियम भरावा लागत आहे. त्यामुळे विमा नोंदणी प्रक्रियेत बदल झाला असला, तरी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर आणि इतर संकटांपासून आर्थिक संरक्षण मिळावे या उद्देशाने अनेक शेतकरी अजूनही पीकविमा काढत आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन या मुख्य पिकाचा सर्वाधिक विमा उतरवला आहे. त्यानंतर कापूस आणि तूर या पिकांचा क्रमांक लागतो. सध्या सोयाबीनसाठी १,२५० रुपये, कापसासाठी १,३०० रुपये, तुरीसाठी ९४० रुपये, मक्यासाठी १०० रुपये, उडीदसाठी ७६ रुपये आणि मुगासाठी ७५ रुपये प्रति हेक्टर प्रीमियम निश्चित करण्यात आला आहे.
Monsoon Update : मान्सूनचा जोर वाढणार? ISRO ‘त्या’ फोटोमुळे वाढली चिंता
गतवर्षी बुलढाणा जिल्ह्यात २ लाख ७० हजार १६७ शेतकऱ्यांनी सुमारे ५ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला होता. त्या तुलनेत यंदा नोंदणीची गती काहीशी कमी असली, तरी अंतिम मुदतीपूर्वी या संख्येत मोठी वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पांगरी येथील शेतकरी बबन वायाळ यांनी ‘एक रुपयात पीकविमा योजना’ बंद करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अनेक शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यामुळे विमा भरण्यात अडचणी येत आहेत. तर जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे यांनी यंदा ‘एल निनो’ चा प्रभाव जाणवण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीकविमा काढून घ्यावा, असे आवाहन केले आहे.






