मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- यूट्यूब)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला अर्थसंकल्प
अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी काढली अजित पवारांची आठवण
अजित पवारांमुळे कठीण काळात राज्याची आर्थिक स्थिती मजबूत – फडणवीस
CM Devendra Fadnavis Live: सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्याआधी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प अजित पवारांना समर्पित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट सादर करताना म्हणाले, “जब हौसला बना लिया ऊँची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का… मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करणार. हायस्पीड ट्रेन दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार. प्रगतशील शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन हे बजेटचे 4 स्तंभ आहेत. दिवंगत अजित पवारांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.”
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव रण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. पुडील 5 वर्षात राज्याला भरीव निधी दिला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे. पर्यटकांच्या सुरक्षित व पर्यावरणपूरक प्रवासाकरिता मुनावळे ते वासोटा रोप वे प्रकल्प करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.”
“कृषिक्षेत्रात भांडवली गुंतवणूक करून पायाभूत सुविधा तयार केली जाणार आहे. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. सूक्ष्म, लघु, उद्योगांना आर्थिक मदत केली जाणार आहे. बुलेट ट्रेनमधील ठाणे ते तलासरीमधील तीन स्थानकांचे काम 2027 पर्यन्त पूर्ण होणार आहे. मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू केला जाणार आहे. गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास येत आहे. राज्याचा कृषी जीडीपी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार केला जाणार,” असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अटल सेतुच्या परिसरात तिसरी मुंबई विकसित केली जाणार आहे. गडचिरोलीत 70 हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये 490 किमी मेट्रो मार्ग तयार केले जाणार. तळेगाव-चाकण उन्नत मार्गाला मंजूरी देण्यात आली आहे. मेट्रोचे जाळे वाढवले जाणार आहे. वाढवणजवळ चौथी मुंबई विकसित केली जाणार आहे. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडले जाणार आहे.






