उद्धव ठाकरे यांची बजेटवर टीका (फोटो- सोशल मीडिया)
आजच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांची टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केले बजेट
बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा
CM Devendra Fadnavis on Maharashtra Budget: आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. तसेच अन्य योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी बजेटवर टीका केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी आजच्या बजेटवर भाष्य केले आहे. शेतकरी, सामान्य नागरिक आणि राज्याची आर्थिक स्थितीबाबत दिशाभूल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र आताच्या बजेटमध्ये त्याबाबत कोणतीही ठोस घोषणा दिसून आलेली नाही.
आमचे सरकार असताना आम्ही कर्जमाफी केली होती. त्यासाठी कोणतेही नियम व अटी ठेवण्यात आल्या नव्हत्या. करोना काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र सध्याच्या सरकारने कर्जमाफी करताना अनेक अटी लावल्या आहेत. सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे घोषणा केली होती. मात्र आताच्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही.
बजेटमध्ये कंत्रा दारांसाठी ठोस योजना दिसून येत आहे. शेतकरी, कामगार, सामान्य नागरिकांसाठी ठोस योजना नाहीत. हा विकासाचा मृगजळ असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
“Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान
शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच ३० सप्टेंबर 2025 पर्यन्त पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. यामुळे ज्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज थकीत आहे त्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे.
Maharashtra Budget Live: “…फिर देखना फिजूल है कद आसमान का”; फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?
“राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. इन्वेस्ट महाराष्ट्र जा प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. आगामी दोन वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 23 हजार किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.






