संगमेश्वरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ (फोटो- सोशल मीडिया)
संगमेश्वर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ
बिबट्याने घेतला गाईचा बळी
गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण
संगमेश्वर: डिंगणी गावात सध्या बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरांचा फडशा पाडण्याचा त्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. गावातील काळ मोहल्ला परिसरात काही दिवसांपूर्वी वासराचा बळी घेतल्यानंतर आता माजी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन मोहिते यांच्या किमती गाईचा बिबट्याने फडशा (Ratnagiri) पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या दोन घटनांमुळे गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
घरालगतच्या गोठ्यात इतर गुरांसोबत वावरत असताना बिबट्याने अचानक झडप मारून गाईचा फडशा पाडला. हल्ल्यावेळी इतर जनावरे जीवाच्या आकांताने सैरावैरा पळाली. शिक्षण घेतले, कष्ट केले, संसार उभा करण्यासाठी जनावरे विकत घेतली; पण त्यावरच संकट आले तर जगायचे कसे? असा संतप्त सवाल सुदर्शन मोहिते यांनी उपस्थित केला आहे. एका किमती दुभत्या गाईच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुग्ध व्यवसायावरच घाला बसला आहे.
निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
गावात मोकाट भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे ग्रामस्थ सांगतात. बिबट्याच्या तावडीतून भटक्या श्वानांचीही सुटका होत नसल्याने तो नियमितपणे गावात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. रात्रीच्या वेळी नागरिक भयभीत अवस्थेत राहत आहेत, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून गावकऱ्यांना सुरक्षिततेची द्यावी, अन्यथा तीव आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बचावलेल्या बिबट्यांची तपासणी बंधनकारक! वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या वन मंत्री गणेश नाईकांच्या सूचना
प्रशासनाने सीसीटीव्ही किंवा ट्रॅप कॅमेरे बसवावे
अवघ्या काही दिवसांत दोन मोठ्या घटना घडूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. वनविभागाने केवळ पंचनामा करून औपचारिकता पूर्ण न करता तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत, नियमित गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही किंवा ट्रॅप कॅमेरे बसवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात येत आहे.
बिबट्याची दहशत कायम
जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुराळा नुकताच संपला आहे. सत्तासंघर्षाच्या या धामधुमीत काही काळ बाजूला पडलेला बिबट्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, बिबट्याने मानवी वस्तीवर केलेल्या हल्ल्यांमुळे जुन्नरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “मतं तर दिली, आता आमचा जीव वाचवा!” असा संतप्त सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.






