Maharashtra ZP Election 2026: मतदानासाठी कामगारांना मिळणार 'भरपगारी सुट्टी'; राज्य सरकारचे कडक आदेश
राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्ताने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवशी १८ वर्षांवरील सर्व नोंदणीकृत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कर्मचारी आणि कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत दिली जावी, असे आदेश राज्य सरकारकडून आस्थापनांना देण्यात आले आहेत.
ज्या १२ जिल्ह्यांमध्ये मतदान आहे, तेथील मतदार जर दुसऱ्या जिल्ह्यात कामाला असतील, तर त्यांनाही मतदान करण्यासाठी सुट्टी दिली जावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना हा निर्णय लागू असेल. यात खाजगी कंपन्या आणि कारखाने, आयटी (IT) कंपन्या आणि औद्योगिक युनिट्स, दुकाने, शॉपिंग मॉल्स आणि रिटेल आउटलेट्स, हॉटेल्स, भोजनालये आणि थिएटर्स या आस्थापनांचा समावेश करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा वापर करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता मालकांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने उद्योग समुह, खासगी कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी पगारी सुट्टी जाहीर केली आहे. उद्योग, कामगार आणि खाण विभागाने आदेश जारी करण्यात आला आहे. (Maharashtra ZP Election)
उद्योग, कामगार आणि खाण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, १८ वर्षे आणि त्यावरील सर्व नोंदणीकृत मतदारांनी निवडणुकीत भाग घेणे आवश्यक आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी उद्योग समुह आणि आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारी रजा मंजू करावी. १२ जिल्ह्यांमधील मतदार जर इतर ठिकाणी काम करत असतील तर त्यांनाही पगारी सुट्टी दिली जावी. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांसाठी हा निर्णय लागू असणर आहे. यासोबतच कारखाने, खाजगी कंपन्या, आयटी कंपन्या, दुकाने, व्यवसाय आणि औद्योगिक युनिट्स,व्यावसायिक प्रतिष्ठाने, निवासी हॉटेल्स, भोजनालये, थिएटर, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेल आउटलेट्स या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही हा निर्णय लागू असेल.
Nuclear War Alert : अमेरिका-रशियामधील ‘तो’ १५ वर्षांचा करार संपला; आता जगाचा विनाश निश्चित?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज रात्री १० वाजता थांबणार आहे. यानंतर कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक सभा किंवा प्रचाराला करता येणार नाही. राज्यातील जिल्हा परिषदांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान, तर, ९ फेब्रुवारी २०२६ मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आणि १४६ पंचायत समिती गणांसाठी ही मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी २९९, तर पंचायत समितीसाठी ५२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. सुमारे २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचारावर शोककळा पसरली होती, ज्यामुळे अनेक ठिकाणी प्रचार शांततेत पार पडला. जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






