Metro 3 Update
Shaina NC WhatsApp Hacked: शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक; 3.92 लाखांची फसवणूक
आरे बीकेसी पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये आणि बीकेसी आचार्य अत्रे चौक स्थानक टप्पा मे २०२५ मध्ये सेवेत दाखल झाला. हे दोन टप्पे सेवेत दाखल झाले तेव्हा जिओ मोबाईल नेटवर्क वगळता एअरटेल आणि व्होडाफोन नेटवर्कची सेवा या टण्यांमध्ये उपलब्ध होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये आचार्य अत्रे चौक – कफ परेड हा शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाला. या टप्प्यावर मात्र कोणत्याच कंपनीची मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.
एमएमआरसीला वाद मिटविण्यात आले यश
अखेर हा वाद मिटविण्यात एमएमआरसीला यश मिळाले आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध करण्यास सुरुवात झाली. आता आरे कफ परेडदरम्यानव्या संपूर्ण ‘मेट्रो ३’ मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क सेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांना आता ‘मेट्रो ३’ मार्गिकेवर प्रवास करताना मोबाईल, लॅपटॉपचा वापर करता येत आहे. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, यामुळे भविष्यात प्रवासी संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.
मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांची होत होती गैरसोय
आरे- बीकेसी पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये आणि बीकेसी आचार्य अत्रे चौक स्थानक टप्पा में २०२५ मध्ये सेवेत दाखल झाला. हे दोन टप्पे सेवेत दाखल झाले तेव्हा जिओ मोबाईल नेटवर्क वगळता एअरटेल आणि व्होडाफोन नेटवर्कची सेवा या टप्प्यांमध्ये उपलब्ध होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये आचार्य अत्रे चौक कफ परेड हा शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाला. या टप्प्यावर मात्र कोणत्याच कंपनीची मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे भुयारी मेट्रो मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क सेवा पुरविण्याची मागणी होत होती. उर्वरित दोन कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क मार्च २०२६ मध्ये ठप्प झाले, दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीवर आक्षेप घेत मोबाईल कंपन्यांनी नेटवर्क सुविधा पुरविण्यास नकार दिला होता. यावरून वाद सुरू होता.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






