फोटो सौजन्य सोशल मीडिया
Nagpur News : लग्नपत्रिका डाऊनलोड करताच मोबाईल हॅक ;६लाखांची सायबर फसवणूक
काही महिन्यांपूर्वीपर्यंत नागपूर एमआरओमध्ये एअर इंडियाची दरमहा सरासरी २ ते ३ विमाने नियोजित देखभालीसाठी येत होती. त्यामुळे अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना नियमित काम मिळत होते आणि एमआरओ पूर्ण क्षमतेने कार्यरत होता. मात्र, संपानंतर परिस्थिती बदलली आहे. सध्या एअर इंडिया नागपूर एमआरओकडे नवीन विमाने पाठविणे टाळत असल्याने येथील कामकाज अत्यंत मर्यादित झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एअरबस ए-३२० विमानही देखभालीसाठी नागपूरला पाठवण्याचे नियोजन केले होते. मात्र, नंतर हा कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर एकही नवीन विमान एमआरओमध्ये आलेले नाही. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये भविष्यासंदर्भात चिंता वाढू लागली आहे.
एमआरओमधील सातत्याने घटणाऱ्या कामामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. नवीन विमाने आली नाहीत तर केवळ केंद्राच्या उत्पादकतेवरच नव्हे तर भविष्यातील रोजगार आणि कामाच्या स्वरूपावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे.
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी नुकतेच विविध मागण्यांसाठी आंदोलन आणि कामबंद पुकारले होते.
राजीनाम्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या नियमांमध्ये बदल, समान कामासाठी समान वेतन तसेच सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.
कोणत्याही एमआरओची क्षमता प्रभावीपणे वापरायची असेल तर तेथे नियमितपणे देखभालीसाठी विमाने येणे आवश्यक असते. आता सर्वांचे लक्ष एअर इंडियाकडे लागले आहे. कंपनीने पुन्हा नागपूर एमआरओला नियमित देखभाल कामे दिल्यास येथील कामकाजाला पुन्हा गती मिळू शकते, मात्र, सध्याची परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास देशातील प्रमुख एमआरओ केंद्रांमध्ये गणल्या जाणाऱ्या नागपूरच्या भूमिकेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
AIIMS Nagpur : शस्त्रक्रियेसाठी तीन-तीन महिने वाट; रुग्णांच्या वाढल्या फेऱ्या..
एअर इंडियाच्या एमआरओमधील कामकाज मंदावले असताना इंडामेर एमआरओमध्ये विमान देखभालीचे काम नियमित सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तेथे दरमहा ४ ते ५ विमाने देखभालीसाठी येत आहेत. यावरून विमान देखभालीची कामे इतर एमआरओ केंद्रांकडे वळत असल्याचे किवा खासगी क्षेत्रातील एमआरओंना अधिक काम मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत.






