नीरा नगरीत संत सोपनकाकांच्या पालखी सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन गेले आहे. मांडकी येथून प्रस्थान झाल्यानंतर पालखी जेऊर येथील पिंपरे( खुर्द) मार्गेस नीरेत प्रवेशा केला. वाटेवर अनेक गावकऱ्यांनी फुलांचा वर्षाव करत टाळ- मृदंगाच्या तालावर पालखीचे स्वागत केले.
सकाळपासूनच भाविकांनी पालखीसाठी नीरेच्या रस्त्यांवर गर्दी केली होती. अहिल्या होळकर चौकापासून भाविकांनी पालखी रथातून उतरुन खांद्यावर घेतली. माऊली… माऊली.. च्या जयघोष केला. त्यानंतर भजन, नामस्मरण आणि टाळ- मृदंगाच्या सुरावटीत पालखी श्री विठ्ठल- रुक्मिणी यांना मंदिरात नेण्यात आले.
उन्हाचा तडाखा जाणवत असला तरी वारकऱ्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेले वारकरी थकलेले दिसत होते. मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी संत सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली. दुपारच्या विश्रांतीदरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठ्या शिस्तीत दर्शनासाठी रांगा लावल्या.
पालखीच्या स्वागतासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, विश्रांतीची आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली होती. यामुळे वारकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला.
११ नवीन दिंड्यांची भर पडल्याने एकूण १२६ दिंड्या
संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे आकर्षण वर्षागणिक वाढताना दिसत आहे. यंदा आणखी ११ नवीन दिंड्यांची भर पडल्याने एकूण १२६ दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. लाखाहून अधिक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पायी वारी करत असल्याचे आयोजकांनी सांगितले. नीरेतील मुक्कामानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. विश्रांती पूर्ण झाल्यानंतर दुपारी पालखीने बारामती तालुक्यातील निंबुतकडे पुढील प्रवास सुरू केला. भक्ती, श्रद्धा आणि एकतेचा सुंदर संदेश देत हा सोहळा पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला.
पुन्हा मोठी कारवाई होणार ! तुकाराम मुंढेंनी हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिला ‘हा’ इशारा






