• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Onion Vegetable Farmers In Problem Because Unseasonal Rain Kedgaon Daund

Onion News: अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका; कांदा उत्पादकांची चिंता वाढली

शेती कामांसाठी सध्या मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कांदा हे पीक वेळेवर काढणे गरजेचे असते. त्यामुळे कांदा काढणे,पात कापणे व पिशवीत भरून देण्यासाठी एकरी १५ हजार रुपये घेत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 12, 2025 | 10:35 PM
Onion News: अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका; कांदा उत्पादकांची चिंता वाढली

कांदा उत्पादक अडचणीत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
केडगाव:  दौंड तालुक्यात गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली असून त्याचा फटका कांदा व भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.पुन्हा दोन दिवसापासून ढगाळ  वातावरण निर्माण होत आहे.त्यामुळे कांदा उत्पादकांनी चिंता वाढत आहे.
 दौंड तालुक्यातील कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहु,पिंपळगाव, देलवडी,खुटबाव,पारगाव, कानगाव,नानगाव,गार येथील शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला कांदा भिजला आहे.शेतकर्‍यांनी आटोकाट प्रयत्न करून आपल्या शेतात उत्पादित केलेल्या कांद्याची मोठी साठवणूक केली होती.

परंतु नुकताच झालेला पाउस व या ढगाळ वातावरणाने या कांद्याची थोड्याच दिवसात  विक्री करायची, असा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे.या मुसळधार पावसामुळे कांदा पिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे  शेतकर्‍यांना कर्ज फेडण्यासाठी तसेच हात उसने घेतलेल्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी पैशांची गरज भासत आहे. त्यामुळे हाताला असलेला कांदा शेतकर्‍यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्याने मार्केटमध्ये कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली. त्याचा फटका दरावर बसला असून कांद्याचे दर प्रचंड प्रमाणात पडले आहेत. सध्या तीन रुपये किलो पासून १६ रुपये किलो पर्यंत कांद्याची विक्री होत आहे. प्रतवारीनुसार कांदा विकला जात असून शेतकर्‍यांच्या पदरात सरासरी सहा ते सात रुपये दराने पैसे मिळत आहेत.

उत्पादन खर्चाचा विचार करता शेतकर्‍याला किमान २० ते २५ रुपये किलोला दर मिळाल्यास तो फायद्याचा ठरू शकतो. मात्र सध्या कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात असून त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही.कांदा हे पीक चार महिन्यांचे असून त्यासाठी मेहनत, खुरपणी, लागवड, बियाणे, रोपे, औषध, खते, फवारणी, मजूर या सर्व बाबींचा विचार करता साधारणपणे ८० ते एक लाख रुपये एकरी खर्च येत आहे. एकरी सरासरी दीडशे ते १६० पिशवी कांद्याचे उत्पादन निघत आहे. त्यामुळे सध्याच्या दराचा विचार करता कांदा विक्रीतून शेतकर्‍याला उत्पादन खर्चाएवढेही पैसे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्याच्या दराचा विचार करता शेतकरी संकटात असून यामध्ये सुधारणा होऊन कांद्याचे दर वाढले नाहीत, तर त्यांच्यापुढे गंभीर समस्या निर्माण होणार आहे.

Monsoon Alert Update: ‘येत्या 4 दिवसांमध्ये राज्यात तीव्र…’; IMD ने दिला ‘हा’ महत्वाचा अलर्ट, कोकणात…

शेती कामांसाठी सध्या मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच कांदा हे पीक वेळेवर काढणे गरजेचे असते. त्यामुळे कांदा काढणे,पात कापणे व पिशवीत भरून देण्यासाठी एकरी १५ हजार रुपये घेत आहेत. काढलेला कांदा शेतकर्‍यांनी आणखी दोन महिने तसाच पिशवीत बंद ठेवला तर तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या शेतकर्‍यांना कांदा चाळीत ठेवणे शक्य होत नाही किंवा त्यांना ते परवडत नाही. सध्या पैशाची गरज असल्याने उत्पादित केलेला कांदा मिळेल त्या दराने विकण्याकडे अनेक शेतकर्‍यांचा कल आहे.
१५ मे नंतर बाजार भाव वाढतील अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती, मात्र तसे घडले नाही. कांदा खराब होण्याच्या भीतीने तो कांदा फार दिवस स्वतःजवळ ठेवू शकत नाही. त्यातच  शेतकर्‍यांना शेतीच्या मशागती साठी  पैशांची गरज भासू लागली आहे. त्यामुळे मिळेल ते पदरात घेण्याच्या भूमिकेने शेतकरी मिळेल त्या भावाने कांदा विक्री करत आहेत.महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले आहेत .परंतु लावकरात लवकर मदत मिळण्याची तरतूद करावी.
 -महादेव धोंडीबा शेलार, शेतकरी

Web Title: Onion vegetable farmers in problem because unseasonal rain kedgaon daund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 10:35 PM

Topics:  

  • baramati
  • Farmers
  • monsoon rains
  • Onion News

संबंधित बातम्या

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा
1

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा

Donald Trump चा ‘खेळ’ आणि भारतीय शेतकऱ्यांना होणार कमालीचा फायदा, ‘या’ गोष्टी होणार स्वस्त
2

Donald Trump चा ‘खेळ’ आणि भारतीय शेतकऱ्यांना होणार कमालीचा फायदा, ‘या’ गोष्टी होणार स्वस्त

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?
3

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; पीक सडल्याने भांडवली खर्चही निघेना
4

कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; पीक सडल्याने भांडवली खर्चही निघेना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान

Nov 19, 2025 | 08:36 AM
Top Marathi News Today Live:  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत

LIVE
Top Marathi News Today Live: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत

Nov 19, 2025 | 08:35 AM
International Men’s Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्यासाठी कुणी केला प्रारंभ आणि का?  जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

International Men’s Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्यासाठी कुणी केला प्रारंभ आणि का? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

Nov 19, 2025 | 08:33 AM
Todays Gold-Silver Price: चांदी थेट 5 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किंमतीही उतरल्या! जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: चांदी थेट 5 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किंमतीही उतरल्या! जाणून घ्या सविस्तर

Nov 19, 2025 | 08:28 AM
TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

Nov 19, 2025 | 08:27 AM
Numerology: मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numerology: मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Nov 19, 2025 | 08:24 AM
१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा, नियमित सेवन केल्यास शरीराची वाढेल रोगप्रतिकारशक्ती

१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा, नियमित सेवन केल्यास शरीराची वाढेल रोगप्रतिकारशक्ती

Nov 19, 2025 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.