• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Proposal For Recruitment Of 67 Employees Adhantari Vacancies To Fire Brigade Nraa

६७ कर्मचारी पदभरतीचा प्रस्ताव अधांतरी, अग्निशमनाला रिक्त पदांचा दंश

शासनाने अग्निशमन विभागासाठी २५ पदे मंजूर केल्याची माहिती आहे. त्यानुसार, येथील अग्निशमन विभागाकडून पदनिहाय किती कर्मचारी लागतील याचा प्रस्तावच शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर शासनाकडून सुधारीत प्रस्ताव मागविण्यात आला. त्यात अग्निशमन विभागाने तीन पाळ्यांकरिता ६७ पदांची मागणी केली आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Apr 05, 2022 | 03:59 PM
Proposal for recruitment of 67 employees Adhantari, vacancies to fire brigade
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गोंदिया : आणीबाणीच्या स्थितीत महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. पदे रिक्त असल्यामुळे विभागाने आणखी ६७ पदांची मागणी केली असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. रिक्त पदांमुळे मात्र, विभागाच्या सेवेवर परिणाम पडत असून, याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर येत आहे.

[read_also content=”आय लाईक डेथ, असे म्हणत मृत्यूनंतरच्या जगाच्या आकर्षणापोटी, त्या १३ वर्षीय मुलीने केली गळफास घेऊन आत्महत्या https://www.navarashtra.com/maharashtra/13-year-old-girl-commits-suicide-by-hanging-herself-at-home-attraction-of-life-after-death-nraa-264600.html”]

कुठेही आग लागल्याची घटना घडल्यास सर्वप्रथम आठवण येते ती अग्निशमन वाहनाची. शिवाय आणिबाणीच्या परिस्थितीतही अग्निशमन विभाग धावून येतो. यावरून अग्निशमन विभागाचे महत्व लक्षात येते. म्हणूनच अग्निशमन विभागाला पाहिजे त्या सुविधा पुरविणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. अग्निशमन विभाग परिपूर्ण असल्यास त्याचा फायदा जनतेलाच मिळतो. मात्र खेदाची बाब अशी की, येथील अग्निशमन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. विभागातील काही मुख्य पदांचाच विचार केल्यास तिही पूर्णपणे भरलेली नसल्याचे दिसत आहे. शिवाय गोंदिया पालिकेकडे असलेल्या अग्नीशमन विभागातील कर्मचाऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून भरती झाली नाही. त्यामुळे, या विभागात असलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विभागात काम करण्याकरिता हवी असलेली लकब नसल्यामुळे मोठी पंचाईत होते.

[read_also content=”चक्क महिला न्यायाधीशांच्या घरीच चोरटयांनी केली चोरी, दागिन्यांसह ३ लाखांचा ऐवज लंपास https://www.navarashtra.com/maharashtra/thieves-broke-into-the-house-of-a-woman-judge-and-stole-rs-3-lakh-along-with-jewelery-nraa-264500.html”]

त्यामानाने जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी विद्युत प्रकल्पात असलेल्या अग्निशमन विभागात अत्याधुनिक साहित्य उपलब्ध असून त्यांना हाताळण्याचे तंत्रज्ञान देखील कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध आहे. चार वर्षांपूर्वी शहराच्या मध्यभागी असलेल्या गोरेलाल चौकात एका हॉटेलला आग लागली होती. त्यात अनेकांचा जीव देखील गेला होता. त्यावेळी तिरोडा येथून बोलावण्यात आलेल्या अग्नीशमन विभागाने जी कार्य तत्परता दाखविली होती. ती पालिकेच्या अग्नीशमन विभागाकडे नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली होती. पालिकेने नुकतेच दोन अत्याधुनिक अग्नीशमन वाहने विकत घेतले आहेत. मात्र, रिक्त पदांचा भरणा असल्यामुळे हे विभाग पंगू झाल्यासारखे आहे. शासनाने पदभरती केल्यास त्याचा उपयोग शहर आणि गोंदिया जिल्ह्याला देखील नक्कीच होणार आहे.

[read_also content=”लग्नाच्या १२ व्या दिवशी त्या युवकावर काळाचा घाला, भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/on-the-12th-day-of-the-marriage-the-young-man-was-killed-in-a-tragic-accident-nraa-264473.html”]

६७ पदांच्या भरतीची मागणी
विभागातील या रिक्त पदांमुळे एकतर सेवेवर परिणाम पडतो. शिवाय विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांवर याचा ताण पडत आहे. विशेष म्हणजे, शासनाने अग्निशमन विभागासाठी २५ पदे मंजूर केल्याची माहिती आहे. त्यानुसार, येथील अग्निशमन विभागाकडून पदनिहाय किती कर्मचारी लागतील याचा प्रस्तावच शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर शासनाकडून सुधारीत प्रस्ताव मागविण्यात आला. त्यात अग्निशमन विभागाने तीन पाळ्यांकरिता ६७ पदांची मागणी केली आहे.

कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांवर भिस्त
अग्निशमन विभागातील मुख्य काही पदांचीच पाहणी केल्यास आजघडीला लिडींग फायरमनची दोन पदे मंजूर असून त्यातील एक पद रिक्त आहे. वाहन चालक-ऑपरेटरची चार पदे मंजूर असून त्यातील दोन पदे रिक्त आहेत. फायरमनची सहा पदे रिक्त असून एक पद रिक्त आहे. अशाप्रकारे १२ पैकी चार पदे रिक्त आहे. त्यामुळे विभागात सध्या ७ वाहनचालक कंत्राटी तत्वावर कार्यरत असून १२ फायरमन रोजंदारीने काम करीत आहेत.

Web Title: Proposal for recruitment of 67 employees adhantari vacancies to fire brigade nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2022 | 03:59 PM

Topics:  

  • Gondia District
  • gondia news

संबंधित बातम्या

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना
1

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक
2

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन
3

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण
4

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.