खेड तालुक्यातील काही भागातील एसटी सेवा बंद फोटो- ai gemini )
खेड तालुक्यातील खचलेले रस्ते आणि पुलावर साचलेले पाणी कमी झाल्यानंतर ही बससेवा पूर्ववत होणार आहे.या भागातील रस्ते इतके खचले आहेत की,त्या मार्गावरून बस वाहतूक करणे शक्य नाही.विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार,खचलेले रस्ते दुरूस्त करण्याची जबाबदारी पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.जितक्या लवकर हे रस्ते दुरूस्त होतील त्यानुसार ही बससेवा पूर्ववत केली जाणार आहे.
ताम्हिणी घाटातील बससेवा अद्याप बंद असून विशेषत: महाड,चिपळून,दापोली गणपतीपुळे या भागात एसटीची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.या मुसळधार पावसाचा फटका एसटी विभागाला आणि प्रवाशांना झालेला आहे.याचा परिणाम मागील आठ दिवसांपासून पुणे एसटी विभागाला दररोज सुमारे ५० ते ६० लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.
‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान
रस्त्यांची परिस्थिती सुधारल्यानंतर ज्या भागात एसटी बससेवा बंद आहे,त्या भागात बसेस सोडण्यात येतील.
कमलेश धनराळे,
विभागीय वाहतूक अधिकारी,पुणे एसटी विभाग
‘लालपरी’ला पावसाचा फटका
मुसळधार पावसाचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या उत्पन्नावर झाला आहे. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार या चार दिवसांत पुणे एसटी विभागाच्या उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे एसटी विभागाला दररोज साधारणतः २ कोटी १० ते २० लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, मागील चार दिवसांपासून हे उत्पन्न घटून १ कोटी ५० लाखांवर आले आहे. म्हणजेच, दररोज ६० ते ७० लाखांनी पुणे एसटी विभागाचे उत्पन्न कमी झाले आहे.
सोमवारी पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्यामुळे मुंबई–पुणे एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पुण्याहून मुंबईकडे सकाळी ६ वाजता रवाना झालेल्या बसेस परत बोलावण्यात आल्या. पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग बंद असल्याचा सर्वाधिक फटका प्रवासी आणि एसटी महामंडळाला बसला.






