संग्रहित फोटो
सदर प्रकरणाची सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीसाठी रविवारी (दि. १ मार्च) सकाळी ९ ते ११ या वेळेत बावडा गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या संदर्भातील निवेदन शुक्रवारी (दि. २७) बावडा-नरसिंहपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात आले. या निवेदनावर पवनराजे घोगरे-पाटील, अशोक मगर, शितल कांबळे, विक्रांत घोगरे, गणेश कांबळे, किशोर घोगरे, मंगेश घोगरे, अमीर सय्यद, हनुमंत भोसले, निलेश घोगरे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
हे सुद्धा वाचा : कांद्याचे भाव घसरले; उत्पादन खर्चही निघेना! जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल
बारामती अजूनही शोकसागरात
आज शनिवार २८ फेब्रुवारी रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र या महिनाभरात काळ पुढे सरकला असला तरी बारामतीकरांच्या मनातील दुःख अजूनही ताजे आहे. जणू कुटुंबातीलच एखादा जिवाभावाचा सदस्य अचानक निघून गेला आणि घरभर पसरलेले शांत, उदास वातावरण अजूनही हललेले नाही, अशीच अवस्था संपूर्ण शहराची झाली आहे. अजितदादांनी अनेक वर्षे बारामतीच्या विकासासाठी घेतलेली धडपड, राबवलेली विविध प्रकल्पांची स्वप्ने आणि सर्वसामान्यांशी ठेवलेला जिव्हाळ्याचा संवाद यामुळे ते प्रत्येकाच्या मनात घर करून होते. त्यांच्या अकस्मात अपघाती मृत्यूने शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला. महिनाभर उलटून गेला तरी बाजारपेठा, चौक, गावोगावी अजूनही त्यांच्या आठवणींचीच चर्चा रंगताना दिसते. गेल्या काही दिवसांत विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलन, सामूहिक प्रार्थना आणि मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. “दादा होते म्हणून आम्हाला आधार होता,” अशी भावना व्यक्त करत अनेकांनी डोळ्यांत अश्रू आणले.






