मांच्या बाजारातून सत्ता मिळविण्यासाठी महामार्गाचा धंदा सुरू माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले, मागणी नसताना शेतकऱ्यांवर लादला जाणारा हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना दिलेला सरळ त्रास आहे. वाळवा तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी शेकडो एकर सुपीक जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. ही जमीन उस, सोयाबीन, भात, गहू, भुईमूग यांसारखी हमखास उत्पादन देणारी आहे.
आमची एकच जिद्द… शक्तिपीठ महामार्ग रद्द…
शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती स्थापन करून बेमुदत आंदोलन छेडणार असून आमच्या सुपिक जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न झाला तर सरकारला सळो की पळो करून सोडू.. कोणत्याही परिस्थितीत आम्ही अन्याय सहन करणार नाही. क्रांतिकारकांच्या भूमीतून पत्री सरकारच्या परंपरेप्रमाणे तीव्र प्रतिकार उभा केला जाईल.
बापूंना अभिवादन करून मोर्चाला झाली सुरुवात
मोर्चाचे नियोजन प्रा. सुहास पाटील, दीपक कोठावळे, उमेश कुरळपकर, भागवत जाधव, अजित हवालदार, प्रवीण पाटील, रणजीत चव्हाण, विजय महाडिक व सर्व सहकाऱ्यांनी केले. पंचायत समिती, इस्लामपूर येथे क्रांतिसिंह नाना पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. भर उन्हात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला व तेथे सभेत रूपातर झाले.






