मुंबई – सध्या महाराष्ट्र व कर्नाटक (Maharashtra Karnatak) या दोन राज्यातील सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. मंगळवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेची जाळपोळ केली. सीमा वादाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून, ठिकठिकाणी आंदोलन करत कर्नाटक सरकारचा (Karnatak government) निषेध करण्यात येत आहे. तर लोकांच्या संतप्त भावना व प्रतिक्रियांचा आगडोंब उसळत आहे. उद्रेकाचं वातावरण तयार झालं आहे.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालांवर कारवाई करतील, उदयनराजे भोसले यांना विश्वास https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-will-take-action-against-the-governor-udayanraje-bhosale-352280.html”]
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde-fadnavis government) सीमाप्रश्नी कोणतीच भूमिका घेत नाही, म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टिका होत असताना, आता यावर सीमाप्रश्नी तिथल्या बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रिमंडळातून नियुक्त केलेल्या मंत्र्यांनी यावर रोखठोक उत्तर दिले आहे. सीमाभागात मराठी भषिकांवर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार आदीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तोडीस तोड उत्तर देतील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. मराठी भाषिकांवर हल्ले होत असताना, शिंदे-फडणवीस सरकार मूग गिळून गप्प आहे, अशी टिका होत असताना, कर्नाटक सरकारला जशाच तसे आम्ही उत्तर देऊ, शिंदे सरकार बसवराज बोम्मईंना तोडीस तोड उत्तर देईल असं मत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.