नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर
कर्जत: रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि जुनी शिवजयंती सोहळा नेरळ मध्ये साजरा होत आला आहे.यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सहा मार्च रोजी तिथीप्रमाणे साजरी होणार आहे.नेरळ येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे हे 56वे वर्षे असून यावर्षी उत्सव समितीचे माध्यमातून शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.दरम्यान, नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून बंडू क्षीरसागर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव 2025 या सोहळ्याचे कार्यकारिणी कडून सहा मार्च रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या तयारीची मीटिंग घेण्यात आली.येथील हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीचे सुरुवातीला 2025 चे उत्सव समितीचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यानंतर सहा मार्च रोजी तिथीप्रमाणे येत असलेल्या शिवजयंती उत्सवाची तयारी करण्यासाठी चर्चा झाली.
या बैठकीत उत्सव समिती स्थापित करण्यात आली असून शिवजन्मोत्सव 2026 चे उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून बंडू क्षीरसागर यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी नवीन अध्यक्ष क्षीरसागर यांचा मावळते अध्यक्ष विशाल साळुंखे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.उपाध्यक्ष म्हणून मुकुल दळवी,हर्षद पार्टे,सचिव म्हणून किरण मालप,आह सचिव म्हणून गुरु क्षीरसागर, खजिनदार म्हणून रमेश पवार,सह खजिनदार म्हणून राहुल भाटकर यांची एकमताने निवडी करण्यात आली.
त्यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते किसन शिंदे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.उत्सव समिती निवड करण्यासाठी आणि उत्सवाचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीला मिलिंद मिसाळ,संतोष पेरणे,प्रीतम गोरी, चिराग गुप्ता, अल्पेश मणवे,मंगेश मगर,सर्वेश गायकवाड,प्रमोद कराळे,यतीन यादव,नीलेश भवारे,सुमित क्षीरसागर,प्रतीक भिसे,हरेश भाटकर,दीप देशमुख,दीर्वांकुर पवार,सर्वेश मिसाळ,रोहन मिसळ,विघ्नेश लाड आदी उपस्थित होते.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात आणि देशभरात अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या या युगपुरुषाने ‘हिंदवी स्वराज्याची’ स्थापना केली। या दिवशी मिरवणुका, पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाराजांच्या शौर्याचे स्मरण केले जाते. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमानाचा उत्सव आहे.
उत्सव आणि महत्व
शिवजयंतीला राज्यात सार्वजनिक सुट्टी असते
सर्वत्र गड-किल्ल्यांवर शिवभक्त जातात आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ चा जयघोष केला जातो
महात्मा फुले यांनी १८७० मध्ये पहिली शिवजयंती साजरी केली होती, असे म्हटले जाते.






