• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • There Will Be No Shortage Of Fertilizers And Seeds In The State Nrdm

राज्यात खते, बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही, कृषी विभागाचं स्पष्टीकरण, अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचेही आवाहन

‘खरीप हंगाम २०२२’ मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे १.७१ कोटी बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे ९८ टक्के क्षेत्र आहे. बीटी कापसाच्या बियाण्यांची २.०१ कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. सोयाबीन पिकासाठी एकूण ३४.५ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. सध्या सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2022 | 02:16 PM
राज्यात खते, बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही, कृषी विभागाचं स्पष्टीकरण, अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचेही आवाहन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : यंदा कापूस, सोयाबीन बियाण्यांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चुकीची माहिती अथवा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध

‘खरीप हंगाम २०२२’ मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे १.७१ कोटी बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे ९८ टक्के क्षेत्र आहे. बीटी कापसाच्या बियाण्यांची २.०१ कोटी पाकिटे उपलब्ध आहेत. सोयाबीन पिकासाठी एकूण ३४.५ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. सध्या सोयाबीनचे ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

सोयाबीन पिकाखालील नियोजित क्षेत्र ४६.०० लाख हेक्टर आहे. त्यासाठी एकूण ३४.५ लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत सार्वजनिक व खासगी क्षेत्रातून १४.६५ लाख क्विंटल एवढे बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. या व्यतिरिक्त खरीप २०२० पासून घरचे बियाणे राखून ठेवायची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत ‘खरीप २०२१’ हंगामात ४४.४६ लाख क्विंटल बियाणे उत्पादित झाले. उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादनातून ४.३७ लाख क्विंटल असे एकूण ४८.८२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होत आहे.

त्यामुळे बियाण्याचा तुटवडा होणार नाही. तसेच खरिपात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग व तीळ ही इतर पिके घेतली जातात. या बियाण्यांचा देखील तुटवडा भासणार नाही. टी कापसाचे दर हे केंद्र शासन ठरवत असल्यामुळे बियाणे जादा दराने विकण्याचा प्रश्‍न उद्‍भवत नाही. केंद्र शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच विक्री होते, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

दरम्यान राज्यातील मागील ३ वर्षांतील सरासरी खत वापर ४१.७३ लाख मे. टन आहे. खरीप हंगाम २०२२ साठी केंद्र शासनाने एकूण ४५.२० लाख मेट्रिक टन आवंटन मंजूर केले. आधी एकूण १२.१५ लाख मे टन खत उपलब्ध होते. सध्या एकूण १७.१७ लाख मे टन खत उपलब्ध आहे.

‘दर्जेदार खते, बियाणे पुरवावेत’

शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाण्यांचा पुरवठा व्हावा. कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाला दिले. त्यानुसार कृषिमंत्री दादा भुसे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी कृषी विभागातील यंत्रणेला यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

[read_also content=”कांद्याला बाजार हस्तक्षेप योजनेत समाविष्ट करा; डॉ. भारती पवार यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे शिफारस https://www.navarashtra.com/maharashtra/include-onions-in-the-market-intervention-plan-dr-bharti-pawars-recommendation-to-union-agriculture-minister-nrdm-289224.html”]

तक्रारींसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष

राज्यस्तरावर हेल्पलाइन नंबर (८४४६११७५००, ८४४६३३१७५०, ८४४६२२१७५०) राज्यभर प्रसारित केले आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त प्रत्येक जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कृषी निविष्ठा या दर्जेदार गुणवत्तेच्या असाव्यात, यासाठी राज्यात ११३१ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. अप्रमाणित आढळलेल्या नमुन्यावर न्यायालयीन खटला दाखल करणे, अप्रमाणित साठ्यास विक्री बंद आदेश देणे, अशी कार्यवाही करण्यात येत आहे. या शिवाय खतांचा काळाबाजार, साठेबाजी, चढ्या दराने खताची विक्री, खते असूनही ती न देणे आदी गोष्टी टाळण्याकरिता विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन केली आहेत. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ८४४६११७५००, ८४४६३३१७५० व ८४४६२२१७५० उपलब्ध आहेत.

Web Title: There will be no shortage of fertilizers and seeds in the state nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2022 | 02:16 PM

Topics:  

  • Agriculture Minister Dada Bhuse
  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
2

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला
3

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
4

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.