संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात, ई-चलनद्वारे आतापर्यंत आकारण्यात आलेले सर्व दंड तत्काळ रद्द करण्यात यावेत, ६० किमीची वेग मर्यादा अत्यंत कमी असून ती किमान ५० टक्क्यांनी वाढवण्यात यावी, रस्त्यावर जागोजागी फोटो काढून अनियंत्रितपणे दंड आकारण्याची पद्धत तत्काळ बंद व्हावी, ५० टक्के आगाऊ दंड भरल्याशिवाय पुढील प्रक्रिया न करण्याची सक्ती रद्द करावी, दुहेरी कर आकारणी थांबवा एकाच रस्त्यासाठी ‘रोड टॅक्स’ आणि ‘टोली’ अशी दुहेरी वसुली थांबवून वाहतूकदारांना दिलासा द्यावा, दंडाच्या माध्यमातून केवळ महसूल गोळा करण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन व्यवसायासाठी घातक आहे, तो बदलावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भौर यांनी कार्यालयाच्या गेटवर येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बस व्यावसायिकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्याऱ्यांनी दिले. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. या आंदोलनात अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, प्रदीप राठोड, राजू ढाले, मनोज चौगुले, पंकज त्रिपाठी, निवास पोवार, अशोक शिंदे, आरिफ कुचकोरी, दिलदार मुजावर, रफिक राऊटर, गौरव कुसाळे, उत्कर्ष पवार, उज्वल लिंगराज, दत्तात्रय पाताडे, रियाज मुजावर यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो बस मालक आणि चालक उपस्थित होते.
या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार संघटना आणि कोल्हापूर लॉरी ऑपरेटर असोसिएशन यांसारख्या विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आआंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.
66 आधीच डिझेल दरवाढ आणि विविध करांमुळे बस व्यवसाय प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे. त्यात ई-चलनचा हा नवीन जाध सुरू झाला आहे. जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर बस व्यवसाय पूर्णपणे बंद पडेल.
– सतीशचंद्र कांबळे, अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटना






