पालघरमध्ये रेल्वेच्या इंजिनला आग (फोटो- टीम नवराष्ट्र)
रेल्वे इंजिनला भीषण आग
पालघरमधील घटना
वलसाड एक्स्प्रेसमधील घटना
Railway Engine Fire News: पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी येत आहे. पालघर जिल्ह्यात एका रेल्वेच्या इंजिनला भीषण आग लागली आहे. पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील केळवे रेल्वेस्थानकाजवळ इजिनला आग लागली आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आठ वाजताच्या सुमारास आग लागली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मुंबवरून गुजरातला जाणाऱ्या वलसाड पॅसेंजरच्या इंजिनला आग लागली आहे. इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच रेल्वे केळवे स्थानकावर थांबवण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. तसेच पालघर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला पालघरमधील केळवे रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी भीषण आग लागली. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या या गाडीच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ही घटना साधारण आठ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने ओव्हरहेड वायर बंद केली असून त्यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावरील इतर गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर विलंबाचा सामना करावा लागत आहे.
आगीची माहिती मिळताच पालघर अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे जवान व रेल्वे कर्मचारी मिळून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष दक्षता घेतली असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगांव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावाचे प्रवेशद्वारावर असलेले जगदीश कराळे यांच्या घराला पहाटे भीषण आग लागली होती.पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास ही आग लागली आणि त्यावेळी जगदीश कराळे यांच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती नव्हते. राहत्या घराला आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र ही आग विझवण्यासाठी आंबिवली गावातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ तत्परता दाखवत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.परंतु ही आग इतकी भयंकर होती की या आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत तसेच या आगीच्या ज्वालांमध्ये घराचे पत्रे देखील फुटले आहेत.






