पाच वर्षांनी वनराणी पुन्हा धावली! बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी आनंदाची सफर
मुंबईकरांच्या बालपणाशी जोडलेली ‘वनराणी’ खेळणी रेल्वे पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा धावू लागली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शनिवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या रेल्वेचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह उद्यान संचालिका अनिता पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ccहोताच उद्यानात आलेल्या मुलांचा आनंद ओसंडून वाहत होता. अनेक लहानग्यांनी गोयल यांच्यासह वनराणीची सफर करत जंगलातील हिरवाईचा आनंद घेतला. पालकांसाठीही ही सफर मुलांना निसर्गाच्या अधिक जवळ नेणारी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
Mumbai-Ahmedabad मार्गावर धावणार भारतीय बनावटीची Bullet Train कधी धावणार? वाचा सविस्तर अपडेट
उद्यानाला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनविण्याच्या दृष्टीने पुढील काळात विविध उपक्रम राबविण्याची योजना आहे. त्यात कान्हेरी गुफा या ऐतिहासिक स्थळाचा वारसा पर्यटन म्हणून विकास, विद्युत वस, विद्युत बग्गी, सायकलिंग उपक्रम आणि उद्यानातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे. १९७० च्या दशकापासून जंगलाची राणी’ म्हणून ओळखली जाणारी वनराणी अनेक पिढ्यांच्या आठवणीशी जोडलेली आहे.
तिचे पुनरागमन हे केवळ पर्यटनाचे आकर्षण नसून मुंबईकरांच्या बालपणाच्या आठवणी पुन्हा जिवंत करणारा अनुभव ठरत आहे. २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वनराणीला मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर ही सेवा बंद होती. आता तिचे आधुनिकीकरण करून पुन्हा सुरू करण्यात आले असून त्यामुळे उद्यानातील पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे. नव्या वनराणीमध्ये पर्यावरणपूरक बॅटरीवर चालणारे इंजिन, आधुनिक डबे आणि सुधारित सुरक्षा व्यवस्था बसविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ‘वारसा’ आणि ‘दृश्य घुमट’ प्रकारचे डबे असल्याने प्रवाशांना जंगलातील निसर्गरम्य दृश्यांचा विस्तीर्ण अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे मुलांसह पर्यटकांना जंगलातून फिरण्याचा वेगळाच आनंद मिळणार आहे. यावेळी बोलताना गोयल म्हणाले, “खेळणी रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा उद्देश मुलांना आणि कुटुंबांना आनंद देणे हा आहे. पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध व्हावा यासाठी विशेष रचनेचे डबे तयार करण्यात आले.






