'नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव 2026'मध्ये डिजिटल क्रांतीचा रोडमॅप; सुधांशू त्रिवेदी-प्रतापराव जाधव मांडणार भूमिका
Navbharat Viksit Bharat Leadership Conclave 2026 From Policy to Progress: भारताला 2047 पर्यंत पूर्णतः विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्याच्या संकल्पाला गती देण्यासाठी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे 7 जुलै 2026 रोजी ‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव 2026’ या महत्त्वपूर्ण परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. भीकाजी कामा प्लेस येथे होणाऱ्या या कॉन्क्लेवमध्ये विकसित भारताच्या दिशेने डिजिटल परिवर्तन, आधुनिक पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि सुशासन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा होणार आहे.
नवभारत नवराष्ट्र मीडिया ग्रुप आयोजित या कॉन्क्लेवमध्ये देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि मान्यवर एकत्र येणार आहेत. भारताला जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल इनोव्हेशन, समावेशक विकास आणि प्रभावी प्रशासन या विषयांवर विविध सत्रांमध्ये सखोल विचारमंथन होणार आहे.
‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह’ मध्ये महिला नेतृत्वावर विशेष …
परिषदेतील विशेष सत्रामध्ये आरोग्य सेवा, राष्ट्रीय धोरण आणि लोकशाही व्यवस्था या विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आयुष मंत्री प्रतापराव जाधव आयुष क्षेत्राचा विस्तार, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या आगामी योजना आणि उपक्रमांची माहिती देणार आहेत.
तर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य डॉ. सुधांशू त्रिवेदी भारताची बदलती राजकीय दिशा, जागतिक स्तरावरील वाढता प्रभाव आणि भविष्यातील धोरणात्मक निर्णयांबाबत आपले विचार मांडणार आहेत.
याशिवाय दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता विधिमंडळातील सुधारणा, पारदर्शक प्रशासन आणि लोकशाही उत्तरदायित्व अधिक मजबूत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर भाष्य करणार आहेत.
या कॉन्क्लेवमध्ये ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेला अधिक बळ देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आधुनिक पायाभूत सुविधा उभारणी आणि सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीवर विशेष चर्चा होणार आहे. देशातील आघाडीचे तंत्रज्ञान तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि स्टार्टअप संस्थापक भारत डिजिटल युगात जागतिक नेतृत्व कसे करू शकतो, याविषयी आपले अनुभव आणि कल्पना मांडतील.
आयोजकांच्या मते, हा कॉन्क्लेव केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून, येथून समोर येणारे निष्कर्ष आणि शिफारसी भविष्यातील धोरणनिर्मितीसाठी सरकार, उद्योग क्षेत्र आणि विविध संस्थांना मार्गदर्शक ठरणार आहेत. विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रांतील समन्वय साधण्याचा प्रयत्न या परिषदेतून केला जाणार आहे.
नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026 – Navarashtra






