पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजनवर मास्क लावण्याची वेळ
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मीक कराड याने काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप होत आणि पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींची खंडणी प्रकरणात कराड मुख्य आरोपी आहे. दरम्यान त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली असून मंगळवारी रात्रभर ऑक्सिजन लावण्याची वेळ आली होती.
मस्साजोगचे ग्रामस्थ झाले आक्रमक; संतोष देशमुख हत्या प्रकरणातील न्यायासाठी जलसमाधी आंदोलन
बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला वाल्मिक कराड काल पुण्यात शरण आला. त्यानंतर वाल्मिक कराडची काल रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली, त्यांनी रात्री फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे. शिवाय वाल्मिक कराड यानी सकाळी नाष्टा केला नाही, कराडला शुगर आहे. त्याचबरोबर त्याला रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला, सध्या वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू आहे.
मंगळवारी रात्री सीआयडीने वाल्मीक कराडला अटक केल्यानंतर त्याला सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची बीडला रवानगी करण्यात आली. बीड मधील जेलमध्ये ठेवण्यात आलं. रात्री वाल्मीक कराडने श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं, त्यानंतर त्याला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी देखील केल्याची माहिती आहे, आत्ता गेल्या दोन तासांपासून सीआयडी चौकशी करते आहे.
कोरेगाव भीमा 207 वा शौर्यदिन; विजयस्तंभाला आकर्षक सजावट, अनुयायींचा जनसमुदाय लोटला
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड काल पुण्यात सीआयडीसमोर शरण आला . या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड याचंही नाव होतं. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी आंदोलने केली. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.