Banjara Marathi Movie Houya Recharge Song Released
स्नेह पोंक्षे दिग्दर्शित ‘बंजारा’चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलीये. मैत्री आणि आत्मशोध यांचा सुंदर मेळ असणाऱ्या ‘बंजारा’ चित्रपटातील ‘होऊया रिचार्ज’हे स्फूर्तिदायी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. तीन मित्रांची बाईकवरील अनोखी सफर गाण्यामध्ये दाखवण्यात आली आहे.
‘हिरामंडी’तील आलमजेब होणार लवकरच आई, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी बनणार आजोबा
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक शान आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला गुरू ठाकूर यांच्या शब्दांची आणि अवधूत गुप्ते यांच्या संगीताची जोड लाभली आहे. स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात मित्रांची धमाल दिसत असतानाच निसर्गसौंदर्यही अनुभवायला मिळत आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणारे हे गाणे पाहायला जितके सुखावह आहे तितकेच श्रवणीय आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक स्नेह पोंक्षेंनी सांगितले की,” ‘होऊया रिचार्ज’गाण्यात केवळ प्रवासच नाही तर आत्मशोध घेण्याची प्रेरणा दाखवण्यात आली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात जिथे आपण थोडे थांबून स्वतः कडे पाहायला विसरतो, तिथे हे गाणं थोडं थांबायला आणि रिचार्ज व्हायला सांगतं. गाणे तयार करताना प्रत्येक फ्रेममध्ये सफर जिवंत वाटावी, यासाठी खूप मेहनत घेतली आहे. हे गाणे ऐकून प्रेक्षकांना मित्रांसोबत असा एखादा प्रवास करावा, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. ”
“दारूच्या व्यसनाने त्याला संपवलं…” Ex पतीच्या निधनानंतर अभिनेत्री शुभांगी अत्रेची पहिली प्रतिक्रिया
चित्रपटाविषयी निर्माते शरद पोंक्षे यांनी सांगितले की, ” ‘होऊया रिचार्ज’गाण्यातून आम्हाला ऊर्जा आणि सकारात्मकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. काहींना हे गाणे नॉस्टॅलजिक बनवेल तर काहींना आपल्या मित्रांसोबत एखाद्या सहलीचे आयोजन करण्याची इच्छा निर्माण करेल. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा ‘बंजारा’ असतो. फक्त त्याला याची जाणीव होणे गरजेचे आहे. असं म्हणतात, प्रवासात माणूस नव्याने सापडतो. हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून आणि गाण्यातून केला आहे.”
‘बंजारा’ चित्रपटाची वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. तर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांनी केले आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज हे कलाकार आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन निर्माती असून शरद पोंक्षे प्रस्तुत हा चित्रपट १६ मे ला प्रदर्शित होत आहे