(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अक्षय कुमार नेहमीच सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांद्वारे लोकांना जागरूक करताना दिसतो. यासोबतच अभिनेता वेळोवेळी समाज आणि देशाप्रती असलेली त्याची नैतिक जबाबदारी देखील पार पाडतो. अलिकडेच, गणपती विसर्जन संपल्यानंतर, अभिनेत्याने जुहू समुद्रकिनाऱ्यावर असे काही केले की सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. अभिनेत्याचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्याने नक्की काय केले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
अक्षय कुमारने जुहू बीचची केली स्वच्छता
अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गणेश विसर्जनानंतर जुहू बीचवर पसरलेला कचरा साफ करताना दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षय कुमारसोबत त्याही स्वच्छता करताना दिसत आहेत.
खिलाडी कुमारचे युजर्सनी केले कौतुक
अक्षय कुमारच्या प्रयत्नांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. एका युजरने लिहिले की, ‘अक्षय कुमार नेहमीच चांगले काम करतो.’ इतर युजर्सनी सोशल मीडियावर अक्षयसाठी हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आणि अभिनेत्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. अक्षय कुमारचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चा करत आहे. तसेच या व्हिडीओला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Bigg Boss 19: मुनावर फारुकीने सलमान समोर अभिषेक बजाजला केले रोस्ट, म्हणाला ‘आवाज खूप करतो, पण काम…’
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
अक्षय कुमार अलीकडेच ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात दिसला होता. लवकरच तो ‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला देखील दिसणार आहेत. याशिवाय अक्षय कुमार ‘भूत बांगला’ आणि ‘हेरा फेरी ३’ हे चित्रपट देखील प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता अभिनेत्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.