(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
परदेशातून येऊन बॉलीवूडमध्ये स्वतःसाठी स्थान निर्माण करणे सोपे नाही. जर तुम्ही चित्रपट कुटुंबाशी संबंधित नसाल किंवा एखादा मोठा चित्रपट निर्माता तुम्हाला लाँच करत नसेल, तर तुमच्यासाठी हा प्रवास आणखी कठीण होतो. वाणी कपूर शेवटची ‘रेड २’ या चित्रपटामध्ये दिसली होती. अभिनेत्री तिच्या आगामी ‘अबीर गुलाल’ चित्रपटाबद्दल चर्चेत होती, जो चित्रपट आता प्रदर्शित होणार नाही आहे. फवाद खानसोबतच्या काही वादामुळे हा चित्रपट भारतात रद्द करण्यात आला आहे. अलीकडेच, वाणी कपूरने न्यूज18 शोशाशी तिच्या चित्रपट जगतातील प्रवासाबद्दल खास संवाद साधला आहे. आणि तिला इंडस्ट्रीमध्ये प्रवास करताना कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला हे देखील अभिनेत्री सांगितले आहे.
वाणी कपूर म्हणाली की इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या काळात तिला रंगभेद आणि बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिचा रंग गोरा नसल्यामुळे एका चित्रपटातून तिला काढून टाकण्यात आले होते आणि तिला हे थेट नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी संवादातून समजले. तू पुढे म्हणाली की, तिने त्यावेळी स्वतःला सांगितले होते की, ‘जर हे तिच्यासाठी आवश्यक असेल, तर मी अशा प्रोजेक्टचा भाग होऊ इच्छित नाही आणि तिला खात्री आहे की ती मुंबईत स्वतःसाठी एक चांगला चित्रपट निर्माता शोधू शकेल.’ हा निर्णय अभिनेत्रीने घेतला होता. अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘तो चित्रपट निर्माता मुंबईचा नव्हता.’
वाणी कपूरने व्यक्त केल्या भावना
वाणी पुढे म्हणाली की, आजही लोक तिला सांगतात की ती खूप शरीराने बारीक आहे आणि तिचे वजन वाढले पाहिजे, परंतु ती या गोष्टींचा तिच्यावर फारसा परिणाम होऊ देत नाही. ती म्हणाली, ‘मी माझ्या शरीरावर आनंदी आहे, मी तंदुरुस्त आहे आणि मी स्वतःवर प्रेम करते. कधीकधी तुम्हाला समजत नाही की हे सर्व लोक तुमच्या काळजीने हे बोलत आहेत की असेच बोलत आहेत’.
चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, वाणी कपूर आता मंडला मर्डर्समध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मर्दानीचे दिग्दर्शक गोपी पुथरन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. वाणी म्हणते, ‘काळ आता बदलत आहे, लोकांना मजबूत महिला पात्रे आवडत आहेत, परंतु अनेकदा महिलांची ताकद ‘रागा’शी जोडली जाते, जे योग्य नाही.’ ती पुढे म्हणाली की आत्मविश्वासाने बोलणे आणि मत असणे हे रागाचे लक्षण नाही. तिचा मुद्दा स्पष्ट करताना वाणी म्हणाली की प्रत्येक वेळी गप्प राहणे योग्य नाही.






