javed Akhtar shows his disappointment over virat kohli test retirement says I Request him to reconsider decision
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केल्यानंतर त्याचे लाखो चाहते निराश झाले आहेत. त्याच्या असंख्य चाहत्यांना धक्काच बसला. रोहित शर्मानंतर विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयाने क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत विराटने त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला. विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर क्रिडाविश्वासह कलाकार मंडळी देखील आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी विराट कोहलीसाठी खास पोस्ट करत त्याला विनंती देखील केली आहे.
Amazon Prime Video आणखी महागणार, जाहिरातीच्या नावाखाली किंमत वाढवून चाहत्यांची फसवणूक!
“अर्थातच, विराट आपल्यापेक्षा अधिक जाणकार आहे. पण या महान खेळाडूचा चाहता म्हणून मी त्याने घेतलेल्या कसोटी क्रिकेटमधून त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे निराश झालो आहे. मला असं वाटतंय की, विराट अजूनही काळ काळ क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे मी विराटला विनंती करतो की त्याने घेतलेल्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा.” असं म्हणत गायक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या भावना एक्सवर ट्वीट करत व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय १२ मे रोजी घेतला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे.
Obviously Virat knows better but as an admirer of This great player I am disappointed by his rather premature retirement from Test cricket cricket . I think there is still a lot of cricket in him . I sincerely request him to reconsider his decision.
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) May 14, 2025
‘Sitaare Zameen Par’ चा ट्रेलर पाहून रितेश देशमुख झाला भावुक, काय म्हणाला अभिनेता?
विराटच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाने अनेक सेलिब्रिटीही दुखावले आहेत. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, रणवीर सिंह, अभिनेत्री नेहा धुपिया, अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांनी याबाबत पोस्ट केल्या होत्या. रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनेदेखील कसोटीमधून निवृती जाहीर केल्याने सध्या क्रिकेटप्रेमी दुखावले असल्याचंही पाहायला मिळतं. विराट कोहलीनं २० जून २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १२३ कसोटी सामन्यांमध्ये ३० शतकांसह ३१ अर्धशतकांच्या जोरावर त्याने कसोटीत ९२३० धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७ द्विशतकाचा विक्रम त्याच्या नावे आहे. २५४ ही कसोटीतील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.