ऋषभ शेट्टींचा कुंडापुरा ते 'कांतारा' पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
सिनेमातील सुरुवातीच्या काळात त्यांनी पडद्यामागे काम करत अनुभव मिळवला आणि तुगलक (2012), लूसिया (2013) आणि उलिदावरु कंडंते (2014) यांसारख्या चित्रपटांत सहाय्यक भूमिका साकारल्या. या अनुभवांमुळे चित्रपट निर्मितीच्या बारकाव्यांची त्यांना खोल समज मिळाली. 2016 मध्ये रिकी या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर आलेल्या ब्लॉकबस्टर किरिक पार्टीने त्यांना एक आश्वासक दिग्दर्शक आणि प्रभावी कथाकार म्हणून ओळख मिळवून दिली.
‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार; टीझरने सोशल मीडियावर उडवला धुरळा
सरकारी हि. प्रा. शाळा, कासरगोडु, कोडुगे: रमन्ना राय (2018) या चित्रपटातून ऋषभ शेट्टी यांच्या क्रिएटिव्ह व्हिजनला आणखी व्यापक दाद मिळाली. या चित्रपटाला बेस्ट चिल्ड्रन्स फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. मात्र, 2022 मध्ये आलेल्या कांताराने त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण आणले. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका स्वतः ऋषभ यांनीच साकारली. कांतारा हा एक सांस्कृतिक फेनोमेनन ठरला आणि त्यांना बेस्ट अॅक्टरचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तसेच बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हायडिंग होलसम एंटरटेनमेंटचा सन्मान मिळाला.
ही यशस्वी घोडदौड कांतारा: चॅप्टर 1मुळे पुढेही सुरू राहिली. या चित्रपटाने संपूर्ण भारतात त्यांच्या उपस्थितीला अधिक भक्कम केले आणि बॉक्स ऑफिसवर त्यांचा दबदबा पुन्हा सिद्ध केला. गुरु दत्त आणि राज कपूर यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत बसणारे ऋषभ शेट्टी आज अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक अशा तिन्ही भूमिका समर्थपणे निभावणारे खरे ‘वन मॅन आर्मी’ म्हणून ओळखले जातात.
रणबीर कपूरचा Animal Park करणार धमाका! चित्रपटाचे शूटिंग सुरु, अभिनेता साकारणार दुहेरी भूमिका
साध्या मुळांपासून ते राष्ट्रीय ओळखीपर्यंतचा ऋषभ शेट्टी यांचा प्रवास हा जमिनीशी जोडलेली कथा, क्रिएटिव्ह प्रामाणिकपणा आणि सिनेमावरील अथक समर्पण किती दूर घेऊन जाऊ शकते, याचे जिवंत उदाहरण आहे.






