खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषदेमध्ये एलपीजी गॅस टंचाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार संजय राऊत यांनी तेल टंचाईमुळे सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, फक्त जय श्रीराम सिलेंडर म्हणा, घरपोच सिलेंडर मिळणार. नमो नमो हा मंत्र जपल्यास पेट्रोल आणि डिझेलही दारात येणार. आपल्या देशात अंधभक्ती पराकोटीला गेल्याचे ते म्हणाले. देशात गॅस टंचाईचे संकट असताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर क्राईसीस कोणता आहे तर केरळ, तामिळनाडूमध्ये, आसाममध्ये निवडणुका जिंकणं हा त्यांच्यासमोरील अजेंडा आहे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हे देखील वाचा : ‘धनुष्यबाण आणि शिवसेना’ कुणाची? साडे तीन वर्षांच्या संघर्षाचा शेवट आज होणार का? सुप्रीम कोर्टात सुनावणी
पुढे खासदार राऊत म्हणाले की, “नमो नमो नमो हा एक मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल. तुमच्या दारात ही मंडळी पाईप घेऊन येतील. नमो नमो नमो म्हणा आणि जय श्रीराम म्हणा, सर्व काही मिळेल इतक्या स्तरावर या देशात अंधभक्ती वाढली आहे. यामुळे या देशातील प्रमुख प्रश्नाची चिंता कुणालाच वाटत नाही,” अशी जोरदार टीका खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.
हे देखील वाचा : विरोधकांनी संसदेत मांडली चूल! गॅस तुटवड्यावरुन सरकारवर आगपाखड
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “सध्याच्या परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान सध्या कुठं आहेत? पंतप्रधान हे केरळमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. देशातील जनतेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गॅस, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलाचं संकट आले आहे. पण त्याच्यावरती पंतप्रधानांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही, कोणतंही साधं वक्तव्य आलेलं नाही. ते केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आणि त्यासाठी सरकारी तिजोरीचा अमाप खर्च करत आहेत. देशाचं दुर्देव आहे की अशा प्रकारचे संवेदनशील शून्य पंतप्रधान लाभले,” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला आहे.






