फोटो सौजन्य- pinterest
भारतीय परंपरेनुसार दिवा हा अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचे प्रतीक आहे. त्यामुळे देवघरात लावला जाणारा प्रत्येक दिवा हा केवळ प्रकाश देणारा नसून, तो मन, शरीर आणि आत्म्याला शुद्ध करणारा मानला जातो. तूप, तिळाचे तेल किंवा इतर तेलांचा वापरही यामागील आध्यात्मिक आणि आयुर्वेदीय विचारांशी जोडलेला आहे. तसेच या तेलाच्या वापर करण्याला आयुर्वेदासोबतच धार्मिक देखील महत्त्व आहे. देवासमोर कोणत्या तेलाचा दिवा लावणे शुभ असते ते जाणून घ्या
गाईच्या तुपाचा दिवा हा सर्वात सात्विक मानला जातो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी येते. हे देवतेला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
तिळाच्या तेलाचा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि शनि किंवा राहु-केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी लावला जातो. हे तेल साडेसातीचा प्रभाव कमी करण्यास मदत करते.
देवापुढे तीळ तेल, शेंगदाणा तेल किंवा तूप यांचेच दिवे लावण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत अत्यंत प्राचीन, सुसंगत आणि बहुआयामी आहे. ही केवळ धार्मिक रूढी नसून, तिच्यामागे आध्यात्मिक तत्त्वज्ञान, आयुर्वेदीय विचार, सामाजिक वास्तव आणि सूक्ष्म वैज्ञानिक आधार यांचा सखोल संगम आहे. या दृष्टिकोनातून या परंपरेचा विचार केला, महत्त्व अधिक व्यापकपणे उलगडते.
दिवा – केवळ प्रकाश नव्हे, तर आंधारावर मिळवलेला विजय आहे. जेव्हा सूर्य मावळतो. तेव्हा एक दिवा सर्वत्र प्रकाश देतो.
भारतीय चिंतनपरंपरेत दिवा म्हणजे ज्ञान, चेतना आणि ईश्वराशी जोडणारा दुवा. अंधार हा अज्ञानाचा प्रतीक, तर प्रकाश हा ज्ञानाचा. त्यामुळे देवासमोर दिवा लावणे म्हणजे स्वतःच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मिक प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रतिज्ञा आहे. या प्रक्रियेत वापरले जाणारे तेल किंवा तूप हे केवळ इंधन नसून, ते मानवी जीवनातील संस्कारांचे प्रतीक मानले गेले आहे.
तीळ तेल – सात्त्विकता आणि शुद्धतेचा स्रोत
तीळ तेलाला आयुर्वेदात “स्नेहाचा राजा” म्हटले जाते.
धार्मिक कार्यात सर्वाधिक योग्य मानले जाते. ऊर्जेचा संतुलित प्रवाह आहे. वातावरणात शांतता आणि स्थैर्य निर्माण करते.
पारंपरिक मान्यतेनुसार तीळ तेलाने लावलेला दिवा वाईट ऊर्जा दूर करतो. तीळ तेलाची निवड ही केवळ श्रद्धेवर आधारित नसून, मानवी मनाच्या स्थैर्यासाठी उपयुक्त अशा घटकांची जाणीवपूर्वक निवड आहे.
शेंगदाणा तेल – व्यवहार्यतेचा आणि सातत्याचा आधार आहे.
भारतीय समाजाच्या ग्रामीण आणि मध्यमवर्गीय वास्तवात, शेंगदाणा तेल हे सहज उपलब्ध आणि परवडणारे साधन आहे. दीर्घकाळ टिकणारी ज्योत नियमित पूजेसाठी उपयुक्त आहे. कमी धूर होतो. घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होते. तिळाच्या तेलाची निवड दर्शवते की, आपल्या परंपरांनी नेहमीच आर्थिक समतोल आणि सामाजिक समावेशकता लक्षात घेतली आहे.
सर्वोच्च पवित्रतेचे प्रतीक आहे. तूप (विशेषतः गायीचे तूप) भारतीय धार्मिक परंपरेत अत्यंत उच्च स्थानावर आहे. यज्ञ, हवन, विशेष पूजा यामध्ये तूपाचे अधिक महत्त्व आहे. तेजस्वी आणि सुगंधी ज्योत मनाला प्रसन्नता आणि एकाग्रता देते. आयुर्वेदातही तूपाला अधिक महत्त्व आहे. शुद्ध तूप वातावरणात सूक्ष्म शुद्धता निर्माण करते. तुपाचा दिवा लावणे म्हणजे ईश्वराप्रती सर्वोच्च आदर आणि शुद्धतेची भावना व्यक्त करणे.
देवासमोरील दिवा, वात, तेल, अगरबत्ती, धूप आदी पूजा साहित्यांना एक महत्त्वाचे स्थान धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे दिवा लावताना त्यात कोणते तेल, तूप वापरतो याचे आपल्या श्रद्धेवर अवलंबून असले तरी तीळ, तूप यांच्या वापराने अधिक प्रसन्नता येते, प्रार्थना अधिक चित्ता एकाग्रतेने होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: दिवा लावणे म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान आणि सकारात्मकतेचा प्रकाश आणणे, असे मानले जाते.
Ans: तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धी वाढते.
Ans: तूप (विशेषतः गायीचे तूप) आणि तिळाचे तेल हे सर्वात शुभ आणि सात्त्विक मानले जातात.






