फोटो सौैजन्य :गुगल
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे, कारण येथे शिव आणि शक्ती या दोघांची एकाच वेळी उपासना करण्याचे पुण्य लाभते. असा विश्वास आहे की, या स्थळाला भेट दिल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते. हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, तसेच देवी सतीच्या 18 महाशक्तीपीठांपैकी एक आहे. याला ‘दक्षिणेचे कैलास’ म्हणूनही ओळखले जाते, जिथे शिव (मल्लिकार्जुन) आणि पार्वती (भ्रमरंबा) एकत्र वास करतात. आख्यायिकेनुसार, भगवान शिव आणि देवी पार्वती आपला पुत्र कार्तिकेय याच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी येथे आले होते. त्यामुळे, हे स्थान कौटुंबिक सुख आणि शांतीचे प्रतीक म्हणूनही मानले जाते.
मंदिराचा इतिहास
मल्लिकार्जुन मंदिर हजारो वर्षे जुने असल्याचे मानले जाते. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये याचा उल्लेख आढळतो.सातवाहन घराणे, विजयनगर साम्राज्य आणि काकतीय घराणे यांसारख्या विविध राजवंशांनी या मंदिराची उभारणी व विस्तार केला. मंदिराची वास्तुकला द्रविड शैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते.
Apara Ekadashi 2026 : अपरा एकादशी म्हणजे काय ? हिंदू धर्मात या दिवसाला इतकं महत्व का आहे ?
काय आहे पौराणिक कथा ?
जेव्हा कार्तिकेय आणि गणेश यांच्यात प्रथम विवाहासाठी शर्यत लागली, तेव्हा कार्तिकेय नाराज होऊन क्रौंच पर्वतावर (श्रीशैलम) निघून गेले.कार्तिकेय रागावून निघून गेल्याचे समजल्यावर शिव आणि पार्वती खूप दुःखी झाले आणि त्यांनी कार्तिकेयच्या मागे क्रौंच पर्वतावर जाण्याचा निर्णय घेतला. तिथे शिव आणि पार्वती आपल्या पुत्राला समजावण्यासाठी आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी स्थायिक झाले. अशी कथा सांगण्यात येते.
मल्लिकार्जुन मंदिरात कसे पोहोचावे ?
मंदिराच्या सर्वात जवळच्या विमानतळाबद्दल बोलायचे झाल्यास, सर्वात जवळचे विमानतळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) आहे, जे अंदाजे २०० किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मार्कापूर रोड रेल्वे स्टेशन आहे, जिथून रस्त्याने श्रीशैलमला पोहोचता येते. हैदराबाद, कुर्नूल आणि विजयवाडा येथून नियमित बस सेवा देखील उपलब्ध आहेत.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






