• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Bjp Leader Smriti Irani Never Returned To Amethi After Losing The 2024 Lok Sabha Elections

निवडणुकीतील पराभवाचा ‘असर’ स्मृती विसरल्या अमेठीतील घर; स्मृतींच्या स्मृती जागविल्या पाहिजे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपमधील अनेक नेत्यांना फटका बसला. यामध्ये महिला नेत्यांमध्ये परखड भूमिका मांडणाऱ्या स्मृती ईराणी यांचा अमेठीमधून पराभव झाला. यामुळे त्यांनी अमेठीकडे पाठ फिरवली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 01, 2025 | 01:58 PM
BJP leader Smriti Irani never returned to Amethi after losing the 2024 Lok Sabha elections.

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये हार झाल्यानंतर भाजप नेत्या स्मृती ईराणी अमेठीमध्ये परत आल्याच नाहीत (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तानाजी म्हणाला, नेताजी आम्ही स्मृतींच्या स्मृती जागविल्या पाहिजेत. अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर स्मृती इराणी तिकडे औषधालाही दिसल्या नाहीत. त्यांचे अमेठीचे घर ओस पडले.  लोक ओसाड घराच्या पाटलीण कुठे आहेत, अशी विचारणा करीत आहेत. त्यांनी तर चांगलं घर बनविले आणि त्या मतदारही झाल्यात.

अमेठीत माशी शिंकली अन् स्मृती भुर्र उडाल्या न परतण्यासाठीच. ‘मै तुलसी तेरे आंगण की’ असे त्या अमेठीच्या मतदारांना म्हणत आधी निवडून आल्यात आता मात्र बेपत्ता झाल्यात. एकता कपूर यांनी ‘सास भी कभी बहू थी’ मालिकेत स्मृती इराणींना महत्त्वाची भूमिका छोट्या पडद्यावर सादर केली होती. स्मृतींनी आदर्श पात्र तुलसी बहूची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे साकारली. यातून त्या घराघरांत पोहोचल्या. अमेठीत भाजपाने त्यांना राहुल गांधींच्या विरोधात उभे करून निवडून आणले. त्यांना केंद्रीय मंत्री बनविले. नेताजी म्हणाले, तानाजी स्मृती इराणी माझ्या चांगल्यात लक्षात आहेत व राहतील. त्यांच्या शैक्षणिक योग्यतेवर काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यांना मानव संसाधन विकासमंत्री बनविले होते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नामवंत शिक्षण संस्था त्यांच्या विभागाच्या अधिनस्थ होत्या. स्मृती ताम-झाम करीत स्वतःला उच्च विद्याविभूषित दर्शवित होत्या. त्यांनी अमेरिकेच्या वेल विद्यापीठातून एक आठवड्याचा सर्टिफिकेट ऑफ पार्टीसिपेशन कोर्स केला आणि त्यालाच त्यांनी डिग्री सांगितले. तानाजी म्हणाला, नेताजी हे बघा मंत्री होण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. चौथी नापास राजकारणात पास होतो. मग मंत्री बनू शकतो. मुद्दा असा आहे की, स्मृती इराणी पराभूत झाल्यावर घरी परतल्या का नाहीत ?

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जेव्हा त्या प्रथम निवडून आल्यात तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, अमेठी माझे घर आहे. लोकांनी खासदार नाही तर दीदीला निवडले आहे. आता घरी एक झाडझूडवाला येतो अन् एक पंडित नवग्रह मंदिराची पूजा करून जातो. मला वाटते स्मृतींच्या स्मृतीतच हे घर नसावे. चार भिंती बांधल्या म्हणजे घर होत नाही. चार भिंतीआड संसार हवा, मग ते घर. नेताजी म्हणाले, अरे तान्या आता त्या मंत्री नाहीत अन खासदारही नाहीत. . त्या बेरोजगार आहेत. एक गीत आहे ‘दुखी मन मेरे, सून मेरा कहना. जहाँ नहीं चैना, वहाँ क्यू रहना.’ राहुल गांधींना पराभूत करणे भाजपाचे मिशन होते. ते पूर्ण झाल्यानंतर स्मृतींना कोण डोक्यावर घेणार? भाजपाच्या ठायी त्या नापास आहेत. अमेठीतील त्यांचे कार्यकर्ते गाण्यातून विचारतात ‘एक चतुर नार, कर के सिंगार, मेरे मन के द्वार घुसत जात, हम मरत जात.’

तानाजी म्हणाला, नेताजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार देणाऱ्या निर्मला सीतारामन यांना पुन्हा अर्थमंत्री बनविले आणि स्मृतीला ते विसरले. त्यांची उपयुक्तता आता संपली आहे. घर विकणे आहे अशी पाटी स्मृतींच्या घरावर लवकरच दिसेल अशी अमेठीत चर्चा आहे. बघू आता काय होते ते.

Web Title: Bjp leader smriti irani never returned to amethi after losing the 2024 lok sabha elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • BJP
  • MP Rahul Gandhi
  • Smriti Irani

संबंधित बातम्या

विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता
1

विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडी बिनविराेधच; ‘या’ तारखेला नावे जाहीर करण्याची औपचारीकता

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद
2

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमालेंची बिनवरोध निवड; राष्ट्रवादीचा अर्ज बाद

राजकीय हालचालींना वेग, पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’; सत्ता स्थापनेसाठी…
3

राजकीय हालचालींना वेग, पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’; सत्ता स्थापनेसाठी…

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड
4

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केरळ आता होणार Keralaam! राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? जाणून घ्या कायदेशीर तरतुदी

केरळ आता होणार Keralaam! राज्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते? जाणून घ्या कायदेशीर तरतुदी

Feb 24, 2026 | 07:58 PM
अजय देवगण-अक्षय कुमारच्या ‘गोलमाल 5’ची शूटिंग सुरू? चित्रपटात दिसणार ‘ही’ साउथमधील लोकप्रिय अभिनेत्री

अजय देवगण-अक्षय कुमारच्या ‘गोलमाल 5’ची शूटिंग सुरू? चित्रपटात दिसणार ‘ही’ साउथमधील लोकप्रिय अभिनेत्री

Feb 24, 2026 | 07:55 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या

Vivo V70 Elite vs OnePlus 15R: परफॉर्मंस की कॅमेरा? 50 हजारांत कोणता फोन ठरेल बेस्ट? जाणून घ्या

Feb 24, 2026 | 07:53 PM
वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

वाळवा तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत! गावालगत वारंवार हल्ले, शिवारात भीतीचं सावट

Feb 24, 2026 | 07:51 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.