• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Independence Day 2025 August 15 Marks Indias Freedom And Global Moments Of Liberty Loss And Change

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

Independence Day 2025: १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतात तिरंगा फडकवला जातो आणि देशभक्ती साजरी केली जाते. जगाच्या इतर भागात, हा दिवस स्वातंत्र्य, शोक आणि ऐतिहासिक बदलांचा दिवस राहिला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 14, 2025 | 09:21 PM
Independence Day 2025 August 15 marks India’s freedom and global moments of liberty loss and change

15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा 'या' ५ ऐतिहासिक घटनांची रंजक कथा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Independence Day 2025 : १५ ऑगस्ट हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि राष्ट्रभक्तीचा दिवस आहे. १९४७ मध्ये याच दिवशी भारताने ब्रिटिश साम्राज्याच्या साखळ्या तोडून स्वतःचा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकवला. स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांच्या, त्यागाच्या आणि संघर्षाच्या कहाण्या त्या क्षणी नव्या भविष्याकडे वळल्या. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? हा दिवस फक्त भारताच्या इतिहासासाठीच नाही, तर जगाच्या इतिहासातही काही मोठ्या आणि निर्णायक घटनांनी सुवर्णाक्षरात नोंदवला गेला आहे. चला तर, १५ ऑगस्टच्या त्या जागतिक क्षणांमध्ये डोकावूया.

१. दुसऱ्या महायुद्धात जपानची शरणागती (१९४५)

१५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानचे सम्राट हिरोहितो यांनी रेडिओवरून जगाला कळवले की जपान मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करत आहे. या घोषणेने दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती निश्चित झाली. ‘विजय-जपान दिन’ म्हणून हा दिवस ओळखला जातो. लाखो जीव गिळणाऱ्या युद्धानंतर हा क्षण जागतिक शांततेकडे टाकलेले निर्णायक पाऊल होता.

२. दक्षिण कोरियाची स्थापना (१९४८)

३५ वर्षांच्या जपानी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर, १५ ऑगस्ट १९४८ रोजी दक्षिण कोरियाची अधिकृत स्थापना झाली. अमेरिकेच्या पाठिंब्याने ‘कोरिया प्रजासत्ताक’ अस्तित्वात आले. कोरियन जनता हा दिवस आपल्या स्वातंत्र्यदिनाप्रमाणे साजरा करते.

हे देखील वाचा : 79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी

३. काँगोचे स्वातंत्र्य (१९६०)

१५ ऑगस्ट १९६० रोजी काँगोने ८० वर्षांच्या फ्रेंच राजवटीला पूर्णविराम देत स्वातंत्र्याची घोषणा केली. आफ्रिकन खंडातील स्वातंत्र्य लाटेचा हा एक महत्वाचा टप्पा ठरला. या स्वातंत्र्याने इतर आफ्रिकन राष्ट्रांना प्रेरणा दिली.

४. बहरीनचे स्वातंत्र्य (१९७१)

१९७१ साली याच दिवशी बहरीनने युनायटेड किंग्डमपासून स्वतंत्र होण्याची घोषणा केली. आखाती देशांमधील तेल शोध, व्यापार आणि आर्थिक विकासामुळे बहरीन आज एक महत्त्वाचे राष्ट्र मानले जाते.

५. बांगलादेशातील राष्ट्रीय शोक दिवस (१९७५)

१५ ऑगस्ट १९७५ हा दिवस बांगलादेशासाठी काळा दिवस ठरला. देशाचे संस्थापक नेते शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या कुटुंबासह हत्या करण्यात आली. या दुःखद घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस आजही राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळला जातो.

हे देखील वाचा : Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा

१५ ऑगस्ट: केवळ तारीख नाही, तर इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस

भारतासाठी हा दिवस स्वातंत्र्याचा प्रतीक आहे, तर जगातील अनेक देशांसाठी तो बदल, संघर्ष, स्वप्नपूर्ती आणि कधी कधी दुःखद आठवणींचा दिवस आहे. इतिहासाच्या या संगमावर भारताचा तिरंगा फडकताना, जगाच्या इतर कोपऱ्यातही विविध ध्वज उंचावत होते, किंवा अश्रूंची धार वाहत होती.
१५ ऑगस्ट म्हणजे राष्ट्रांना स्वातंत्र्याच्या नव्या पहाटेचा अनुभव देणारा दिवस, आणि इतिहासाच्या पानांमध्ये सदैव तेजाने चमकणारा क्षण.

Web Title: Independence day 2025 august 15 marks indias freedom and global moments of liberty loss and change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • Independence Day
  • Independence Day 2025
  • World news

संबंधित बातम्या

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच
1

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत
2

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका
3

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

१० लाख नोकऱ्या अन् ९ लाखाची गुंतवणूक…; भारत आणि युरोपीय देशांमध्ये FTA करार लागू
4

१० लाख नोकऱ्या अन् ९ लाखाची गुंतवणूक…; भारत आणि युरोपीय देशांमध्ये FTA करार लागू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

Dasara Melava 2025 Maharashtra LIVE : राजकीय मेळावा शिवतीर्थ विरुद्ध नेस्को! ठाकरे बंधू एकत्र येणार का? जाणून घ्या सर्वकाही

LIVE
Dasara Melava 2025 Maharashtra LIVE : राजकीय मेळावा शिवतीर्थ विरुद्ध नेस्को! ठाकरे बंधू एकत्र येणार का? जाणून घ्या सर्वकाही

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी

IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल

IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल

भाईंदरमधील जागृत देवस्थान; धारावी देवीच्या मंदिरात दसऱ्यानिमित्ताने भाविकांची अलोट गर्दी

भाईंदरमधील जागृत देवस्थान; धारावी देवीच्या मंदिरात दसऱ्यानिमित्ताने भाविकांची अलोट गर्दी

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.