• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Independence Day 2025 The Man Who Drew The India Pakistan Border Had Never Seen It

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Independence Day 2025 : भारत-पाकिस्तान सीमारेषा काढणाऱ्या व्यक्तीने कधीही भारतीय भूमीवर पाऊल ठेवले नव्हते. ही सीमा लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या फाळणीच्या दुर्घटनेचे कारण बनली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 15, 2025 | 02:45 PM
Independence Day 2025 The man who drew the India-Pakistan border had never seen it

भारत-पाकिस्तान सीमारेषा आखणाऱ्या व्यक्तीने कधीच भारत पाहिला नव्हता, जाणून घ्या फाळणीची 'ती' न सांगितलेली कहाणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Independence Day 2025 : भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, ७८ वर्षांपूर्वी घडलेल्या एका ऐतिहासिक आणि हृदयद्रावक घटनेची आठवण होते  फाळणीची कहाणी. देशाच्या नकाशावर आज ज्या भारत-पाकिस्तान सीमारेषा दिसतात, त्या आखणारा माणूस असा होता, ज्याने त्या आधी कधीही भारतीय भूमीवर पाऊलसुद्धा ठेवले नव्हते. त्याचे नाव होते सर सिरिल रॅडक्लिफ.

ब्रिटिश वकिलाकडे ‘सीमा रेषा’ आखण्याचे अवघड काम

ब्रिटनमधील सुप्रसिद्ध वकील सर सिरिल रॅडक्लिफ यांची सीमा आयोगाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. १७ कोटी लोकसंख्या असलेल्या या उपखंडाचा नकाशा तयार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना फक्त ५ आठवडे दिले. त्यांना पंजाब आणि बंगालचे विभाजन करून हिंदू आणि मुस्लिम बहुल भागांच्या आधारे दोन राष्ट्रे  भारत आणि पाकिस्तान निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु रॅडक्लिफ यांना भारताचा भूगोल, राजकारण वा सांस्कृतिक पार्श्वभूमीची कोणतीही माहिती नव्हती.

हे देखील वाचा : 15 August ही तारीख ठरली जागतिक इतिहासाचा प्रवाह बदलणारा दिवस; वाचा ‘या’ 5 ऐतिहासिक घटनांची रंजक कथा

माहिती जुनी, वास्तव वेगळे

रॅडक्लिफ यांच्याकडे असलेली माहिती जुनी जनगणना, आकडेवारी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचे अहवाल इतकीच होती. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती खूप गुंतागुंतीची होती गावे, शहरे, जिल्हे हे धार्मिकदृष्ट्या एकसंध नव्हते. हिंदूबहुल गावाच्या मध्यभागी मुस्लिम वस्ती तर मुस्लिमबहुल भागात हिंदू गावे होती. धर्माच्या आधारावर रेषा आखण्याचा प्रयत्न करताना, वास्तवातील ही मिसळलेली लोकसंख्या मोठा अडथळा ठरली.

१७ ऑगस्ट १९४७ : ‘रॅडक्लिफ रेषा’ जाहीर

स्वातंत्र्यानंतर फक्त दोन दिवसांनी, १७ ऑगस्ट १९४७ रोजी, रॅडक्लिफ यांनी आखलेली सीमा जाहीर झाली. उद्दिष्ट होते हिंसाचार टाळणे, परंतु निकाल उलट लागला. या रेषेने एका क्षणात लाखो लोकांना दुसऱ्या देशाचे नागरिक बनवले. पंजाब आणि बंगालमध्ये भयानक दंगली उसळल्या. गावे पेटली, मृतदेहांनी भरलेल्या गाड्या चालू लागल्या, आणि या हिंसाचारात १० ते १५ लाख लोकांनी जीव गमावला. लाखो लोक विस्थापित झाले.

रॅडक्लिफचे पश्चात्ताप

या घटनांनी रॅडक्लिफ यांना खोलवर हादरवले. भारत सोडण्यापूर्वी त्यांनी आपली सर्व कागदपत्रे जाळून टाकली, जेणेकरून त्यांच्या निर्णयांबद्दल पुढे कोणताही वाद निर्माण होऊ नये.

हे देखील वाचा : 79वा स्वातंत्र्यदिन आणि इतिहासातील सुवर्णक्षण…वाचा स्वतंत्र भारताच्या पहिल्या टपाल तिकिटाची ‘ही’ अनोखी कहाणी

नंतर त्यांनी कबूल केले…

“जर मला या कामाचे गांभीर्य आणि त्याचे परिणाम आधीच कळले असते, तर मी हे काम कधीही स्वीकारले नसते.”

आज, स्वातंत्र्यदिनाच्या या पर्वावर, ही कहाणी आपल्याला आठवण करून देते की एका अनभिज्ञ माणसाच्या पाच आठवड्यांच्या निर्णयाने लाखो लोकांचे जीवन कायमचे बदलून गेले. भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा हा फक्त नकाशावरील एक रेषा नसून, ती असंख्य जखमा, अश्रू आणि बलिदानांची साक्ष देणारी वेदनांची कहाणी आहे.

Web Title: Independence day 2025 the man who drew the india pakistan border had never seen it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Independence Day
  • Independence Day 2025
  • Independence Day Special
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर
1

Pune Navaratri 2025: पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर, वाचा सविस्तर

घरच्यांनीच केला घात अन् इंग्रजांनी दिली अंगावर काटा आणणारी शिक्षा; बंगालच्या शेवटच्या राजाची करुण कहाणी
2

घरच्यांनीच केला घात अन् इंग्रजांनी दिली अंगावर काटा आणणारी शिक्षा; बंगालच्या शेवटच्या राजाची करुण कहाणी

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या
3

Navratri 2025: शिवनगरी वाराणसीतील माँ कालरात्री मंदिराची अद्भुत कहाणी; जिथे आईने शेकडो वर्षे केली कठोर तपश्चर्या

Mansa Devi : जाणून घ्या भगवान महादेवांच्या शरीरातून हलहल विष काढणाऱ्या शिवकन्या मनसा देवीची गूढ पौराणिक कथा
4

Mansa Devi : जाणून घ्या भगवान महादेवांच्या शरीरातून हलहल विष काढणाऱ्या शिवकन्या मनसा देवीची गूढ पौराणिक कथा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते? मग आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते? मग आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Navrashtra Navdurga: अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा ‘पर्यावरणपूरक’ उपाय

Navrashtra Navdurga: अस्मिता गोखलेंनी सांगितला वर्षानुवर्ष टिकणारं प्लास्टिक नष्ट करण्याचा ‘पर्यावरणपूरक’ उपाय

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

Baba Vanga : 2026 मध्ये सर्व संपुष्टात येणार ! मनुष्य होणार गुलाम…; बाबा वेंगांची पुढील वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप

कशाला घेता उगाच तणाव अन् टेन्शन; सतत देत रहा एकमेकांना मोटिव्हेशन

कशाला घेता उगाच तणाव अन् टेन्शन; सतत देत रहा एकमेकांना मोटिव्हेशन

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.