Shaheed Diwas 2026: राष्ट्रपिता गांधी ते सीमेवरील जवान! एकाच धाग्यात गुंफलेला बलिदानाचा इतिहास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Shaheed Diwas 30 January 2026 Marathi : आज ३० जानेवारी! कॅलेंडरवरची ही तारीख भारतीय इतिहासातील सर्वात दुःखद आणि तितकीच महत्त्वाची मानली जाते. आजचा दिवस संपूर्ण देश ‘हुतात्मा दिन’ (Shaheed Diwas) म्हणून साजरा करतो. आजच्याच दिवशी १९४८ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना सभेला जात असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गांधीजींच्या अहिंसेच्या प्रवासाचा हा शेवट असला, तरी त्यांच्या विचारांची ज्योत आजही अखंड तेवत आहे.
३० जानेवारीची ती संध्याकाळ आजही इतिहासात रक्ताळलेली आहे. नवी दिल्लीतील बिर्ला भवनाच्या आवारात गांधीजी नेहमीप्रमाणे प्रार्थना सभेसाठी निघाले होते. त्यांच्यासोबत मनु आणि आभा या त्यांच्या नाती होत्या. तितक्यात गर्दीतून नथुराम गोडसे समोर आला आणि त्याने गांधीजींच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. “हे राम…” हे शब्द बापूंच्या मुखातून निघाले आणि भारताचा हा महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेला. गांधीजींच्या बलिदानाची ही आठवण म्हणून केंद्र सरकारने ३० जानेवारी हा दिवस ‘हुतात्मा दिन’ म्हणून घोषित केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ISRO : जेव्हा रात्र भयाण झाली आणि नभ रक्तवर्णी; लडाखमध्ये जे घडलं ते पाहून शास्त्रज्ञही हादरले, ‘AdityaL1’ ठरले सुरक्षाकवच
हुतात्मा दिनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सकाळी ११ वाजता पाळले जाणारे ‘मौन’. या दिवशी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि तिन्ही दलांचे प्रमुख राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर जाऊन पुष्पहार अर्पण करतात. सकाळी ११ वाजता संपूर्ण देशभरात सायरन वाजवला जातो, ज्यानंतर दोन मिनिटांचे मौन पाळले जाते. हे दोन मिनिटांचे मौन केवळ गांधीजींसाठीच नाही, तर देशाच्या सीमांचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या प्रत्येक सैनिकासाठी आणि क्रांतीकारकासाठी असते.
Martyrs’ Day 2026: Every year Shaheed Diwas or Martyrs’ Day is commemorated on 30 January in India to mark Mahatma Gandhi’s death anniversary who was assassinated by Nathuram Godse. This day is also observed to pay tribute to all the freedom fighters who had lost their lives in… pic.twitter.com/eKc7nGZpar — SA News Channel (@SatlokChannel) January 30, 2026
credit – social media and Twitter
आजच्या धावपळीच्या युगात ‘हुतात्मा दिन’ तरुणांना आपल्या मुळांकडे पाहण्याची संधी देतो. आपण आज ज्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, ती मिळवण्यासाठी किती जणांनी आपल्या रक्ताचा अभिषेक केला आहे, याची जाणीव हा दिवस करून देतो. लोकशाही, अहिंसा, राष्ट्रीय एकता आणि त्याग या मूल्यांचा स्वीकार करणे हीच खऱ्या अर्थाने त्या शहीदांना दिलेली मोठी श्रद्धांजली ठरेल. केवळ सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यापेक्षा, देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून जगण्याची प्रेरणा हा दिवस आपल्याला देतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gold Street : ‘सिटी ऑफ गोल्ड’ मध्ये बनणार सोन्याचा रस्ता; जाणून घ्या कुठे आहे ‘ही’ सुवर्णनगरी? पहिलाच VIDEO झाला रिलीज
अनेक वाचकांच्या मनात हा गोंधळ असतो की शहीद दिन नक्की कधी असतो? भारतात मुख्य दोन तारखांना हा दिवस पाळला जातो. ३० जानेवारी हा महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त ‘हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो, तर २३ मार्च हा दिवस भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतीकारकांच्या बलिदानाप्रीत्यर्थ ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांचे महत्त्व आणि भावना एकच आहे – देशाप्रती समर्पण!
Ans: ३० जानेवारी हा दिवस 'हुतात्मा दिन' (Martyrs' Day) म्हणून साजरा केला जातो, जो महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन आहे.
Ans: देशाच्या स्वातंत्र्य आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सकाळी ११ वाजता दोन मिनिटे मौन पाळले जाते.
Ans: ३० जानेवारी ही महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे, तर २३ मार्च हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचा हौतात्म्य दिन आहे. दोन्ही दिवसांना शहीद दिन म्हटले जाते.






