श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : IND vs AUS : BCCI ने केली संघाची घोषणा! श्रेयस अय्यर सांभाळणार संघाची धुरा, या खेळाडूंना संघामधून वगळलं
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडून अलीकडेच रेड बॉल क्रिकेटमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने या निर्णयाला दुजोरा दिला आहे. बीसीसीआयने असे म्हटले आहे की, श्रेयस अय्यरने स्वतः बोर्डाला या निर्णयाची माहिती दिली होती. यामागील मुख्य कारण सांगताना बीसीसीआयने जारण सांगितले आहे की, या ब्रेक मागे त्याची पाठदुखी हे एक कारण आहे.अय्यरने अलीकडेच यूकेमध्ये पाठीची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. सुरुवातीला ते पूर्णपणे बरे दिसत होते, परंतु दीर्घ स्वरूपाच्या सामन्यांदरम्यान त्याला वारंवार पाठीत दुखणे आणि कडकपणा जाणवू लागला होता. त्यामुळे त्याने आता सहा महिन्याचा ब्रेक घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ आणि शेष भारत संघ जाहीर केला आहे. या संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची नियुक्ती केली आहे. या मालिकेतील पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे, तर शेष भारत संघ १ ऑक्टोबर रोजी विदर्भाशी सामना करणार आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अय्यरकडे भारत अ संघाचा कर्णधार म्हणून जबाबदरी सोपवण्यात आली आहे.






