हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर उभे राहिले प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य - Instagram)
केवळ नेतृत्वच नाही तर हार्दिक पंड्याची संघातील इतर खेळाडूंसह असणारी वागणूकही सध्या समोर येत आहे. नुकतेच पंजाबविरूद्धच्या खेळात जसप्रीत बुमराहसह झालेले भांडण हे जगासमोर दिसून आले. तर हार्दिकने मैदानावर घेत असलेले निर्णय पाहता रोहित शर्मानेही डोक्याला हात लावलेला एका व्हिडिओत दिसून आला होता. यामुळे मुंबई इंडियन्सच्या अधःपतनाला हार्दिक पंड्यालाच जबाबदार धरलं जात आहे.
MI Vs PBKS: नावातच ‘कॉक’ अन् खेळात ‘रॉक’; वादळी शतक करत पंजाबला केले चारी मुंड्या चीत
मुंबई इंडियन्सची बिकट अवस्था
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर संघर्ष करत आहे. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे निर्णय आणि संघातील समन्वय पूर्णपणे बिघडलेला दिसत आहे. गुरुवारी, वानखेडे स्टेडियमवर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर चिरडून या हंगामातील चौथा पराभव दिला.
मनोज तिवारींचा सडेतोड हल्ला
क्रिकबझवरील एका चर्चेदरम्यान, मनोज तिवारींनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्व क्षमतेवर जोरदार टीका केली. तिवारींच्या मते, हार्दिकने मुंबईचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून त्याचे मैदानातील निर्णय सामान्य दर्जाचे राहिले आहेत. त्यांनी असा युक्तिवाद केला की, पंजाबविरुद्धच्या सामन्यातही हार्दिकच्या गोलंदाजीतील रोटेशन आणि क्षेत्ररक्षणाच्या रणनीतीचा संघाला फायदा झाला नाही. मनोज तिवारी म्हणाले की, पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाकडून अशा दिशाहीन कामगिरीची अपेक्षा नव्हती आणि याचे थेट कारण हार्दिकच्या कर्णधारपदाच्या अनुभवाचा अभाव किंवा दबाव हाताळण्याची असमर्थता हे आहे.
फक्त एक विजय आणि पराभवांची मालिका
मुंबई इंडियन्सची या हंगामातील अवस्था यावरून लक्षात येते की, त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या पाचपैकी चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईला या हंगामात आतापर्यंत मिळालेले एकमेव यश २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध मिळाले होते. पंजाब किंग्सविरुद्धच्या ताज्या पराभवामुळे मुंबईचा प्लेऑफचा मार्ग आधीच कठीण झाला आहे.






