मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारताने इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ६ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यातील भारताच्या विजयाचा हिरो ठरलेला मोहम्मद सिराज आपल्या मायदेशी परतला आहे. इंग्लंडमध्ये आपल्या शानदार कामगिरीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्यानंतर, सिराज बुधवारी त्याच्या मूळ गावी हैदराबाद येथे पोहोचला आहे. जिथे त्याचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले आहे. नुकत्याच संपलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये मालिका २-२ ने बरोबरीत सुटली आहे. यामध्ये मोहम्मद सिराजच्या कामगिरीचे मोठे योगदान आहे.
हेही वाचा : ICC Test Rankings मध्ये DSP सिराजचा जलवा! मिळवली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग; जयस्वाल टॉप ५ मध्ये परतला..
मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २३ बळी टिपले आहेत. या मालिकेत सिराज सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील ठरला आहे. ओव्हल कसोटी सामन्यात सिराजने दोन्ही डाव मिळून ९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या कामगिरीने ओव्हल कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला. त्याच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून देखील निवडण्यात आले आहे. त्याने पाचही सामने खेळले असून यादरम्यान त्याने १८५.३ षटके गोलंदाजी केली आहे.
हैदराबादचा रहिवासी असणाऱ्या मोहम्मद सिराजने इंग्लंड सोडल्यानंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीपसोबत एक फोटो देखील शेअर केला. तो टी दिलीपसोबत मुंबईत पोहोचला होता. जिथे त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. सिराज कॅज्युअल गेटअपमध्ये दिसून आला. दरम्यान, सिराजकडे चाहत्यांनी सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी विनंती करण्यात आली, परंतु तो लगेच गाडीत बसला आणि हैदराबादसाठी रवाना झाला. हैदराबादमधील चाहते त्याची वाटच बघत होते.
VIDEO | Hyderabad: Cricketer Mohammed Siraj (@mdsirajofficial) returned to his hometown from London earlier today. Siraj grabbed a five-wicket haul in the second innings of the fifth Test at The Oval as India defeated England by six runs in a thriller to draw the series 2-2 on… pic.twitter.com/QiGhI5jAIK
— Press Trust of India (@PTI_News) August 6, 2025
दरम्यान, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याकडून पीटीआयला सांगण्यात आले आहे की, “आम्ही अद्याप त्याच्याशी बोललो नसून सिराजच्या सन्मानार्थ आम्ही निश्चितपणे काहीतरी खास नियोजन करणार आहोत. तो आता काही दिवस हैदराबादमध्ये राहण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
हेही वाचा : IND vs ENG : ‘देशासाठी वेदना आणि अस्वस्थता विसरा’ : भारताचे दिग्गज माजी फलंदाज सुनील गावसकर यांचे परखड मत
इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात सिराजने पहिल्या डावात ८६ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात १०४ धावा देऊन ५ बळी टिपले. ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ७ वेळा ४ विकेट्स घेणारा तो पहिला आशियाई गोलंदाज देखील बनला आहे.