तासंतास लघवी रोखून धरता? चुकीच्या सवयींमुळे महिलांना होऊ शकते 'या' गंभीर आजारांची लागण, वेळीच व्हा सावध
स्त्रियांनी जास्त वेळ लघवी का रोखून धरू नये?
लघवीसंबंधित आजार कशामुळे होतात?
मूत्राशय निकामी होण्याची कारणे?
सर्वच महिला कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. सतत काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, पोषक घटकांचा अभाव आणि बिघडलेले मानसिक आरोग्य शरीरावर थेट परिणाम करते. पण शरीराच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. तासंतास एका जागेवर बसून राहिल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. महिला कामाच्या घाईमध्ये किंवा स्वच्छते अभावी लघवी रोखून धरतात. पण असे केल्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने समस्या अतिशय गंभीर होतात आणि संपूर्ण आरोग्य बिघडून टाकतात. स्त्रिया अतिशय सामान्य वाटणारी समस्या भविष्यातील आजारांचे गंभीर कारण बनते.(फोटो सौजन्य – istock)
Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम
तासंतास लघवी रोखून धरल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. लघवीवाटे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. पण वेळीच लघवीला न गेल्यामुळे विषारी घाण तशीच शरीरात साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे किडनीसंबंधित आजार किंवा लघवीसंबंधित आजारांचा सामना करावा लागतो. महिलांनी तासंतास लघवी रोखून धरल्यास शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात आणि आरोग्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला तासंतास लघवी रोखून धरल्यामुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होऊ शकते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे महिलांनी चुकीच्या सवयी सोडून शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.
शरीरातील विषारी घाण लघवीवाटे बाहेर पडून जाते. पण हेच विषारी घटक वेळीच बाहेर पडून न गेल्यास किडनीचे आरोग्य बिघडण्यासोबतच महिलांना इतर गंभीर आजारांची लागण होऊ शकते. दीर्घकाळ लघवी रोखून धरल्यामुळे जिवाणूंना वाढण्यास पुरेसा वेळ मिळतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यानंतर लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे किंवा लघवीला दुर्गंधी येणे तसेच लघवीच्या रंगात असामान्य बदल जाणवू लागतो. त्यामुळे शरीरात वरील लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे.
ज्यावेळी तुम्ही तासंतास लघवी रोखून धरता तेव्हा मूत्राशयावर दबाव पडतो. सामान्य क्षमतेपेक्षा जास्त दबाव पडल्यामुळे महिलांना लघवी करताना किंवा लघवी झाल्यानंतर वेदना होतात. मूत्राशय पूर्णपणे रिकामे न वाटणे किंवा वारंवार लघवीला येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. यामुळे मूत्राशयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.लघवीला तासंतास न गेल्यामुळे UTI चा धोका वाढतो. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास संसर्ग किडनीपर्यंत पोहचण्याची शक्यता असते.
डॉक्टरांच्या मते, तासंतास लघवी थांबवून ठेवणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे किडनीमध्ये खडे सुद्धा होतात. लघवी रोखून धरल्यामुळे स्नायूंवर जास्तीचा तणाव पडतो. हा तणाव कायम टिकून राहिल्यास युरिनरी इनकंटिनन्स होऊन खोकल्यावर किंवा शिंकल्यावर लघवी गळण्याची समस्या उद्भवू शकते. मूत्राशयाचे आकुंचन-प्रसरण व्यवस्थित न झाल्यामुळे मूत्राशय निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कामाच्या धावपळीमधून सुद्धा स्वतःच्या शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.
Ans: लघवी दीर्घकाळ रोखल्याने मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), मूत्राशयाचा दाह, किडनी इन्फेक्शन आणि मूत्राशय कमकुवत होण्याचा धोका वाढू शकतो.
Ans: महिलांचा मूत्रमार्ग लहान असल्यामुळे जीवाणूंना मूत्राशयापर्यंत पोहोचणे सोपे जाते. त्यामुळे लघवी रोखून धरण्याची सवय संसर्गाचा धोका वाढवते.
Ans: लघवीची तीव्र इच्छा झाल्यानंतर ती शक्य तितक्या लवकर करणे योग्य आहे. वारंवार किंवा तासन्तास लघवी रोखणे टाळावे.






