मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भूसंपादन मोबदला, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि कृषी विभागाशी संबंधित निर्णयांचा यात समावेश आहे.
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधत जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप…
पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आटपाडीमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर आरोप करत गद्दारी करणाऱ्यांनाही इशारा दिला.
देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या एकाच विमानातील प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत या प्रवासाचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं सूचित केलं.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 23,508 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 175 कोटी 78 लाख 55 हजार 144 रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त झाले आहेत.
अशा प्रकारचे साहित्य छापणे, प्रसारित करणे, विक्री करणे, प्रदर्शित करणे, साठवून ठेवणे किंवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणे हे भारताच्या सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे सरकारने स्पष्ट…
Nashik National AI and Data Science Education Centre: भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा संगम घडवण्यासाठी नाशिकमध्ये केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर विकसित करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे समर्थन करत त्यांनी समाजात तेढ निर्माण करणारी…
मराठवाड्यातील चार महिला लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा जात पडताळणी प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट…
सीएसआर-समर्थित प्रशिक्षण भागीदारी, सातत्यपूर्ण नियोक्ता सहभाग, नियमित रोजगार मेळावे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित धोरणात्मक विश्लेषणामुळे रोजगारनिर्मितीची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लक्ष्याधारित झाली आहे.
लोकमान्य टिळक यांच्या 106 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा गौरव…
नागपूर विमानतळ परिसरातील नागरी विकासाच्या नियोजनाशी सुसंगत असा हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीचा विचार करून याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
Satellite Phone for Fishermen News: मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतून महाराष्ट्रातील मच्छिमारांना BSNL चे सॅटेलाइट फोन मिळणार आहेत. यामुळे खोल समुद्रात नेटवर्क नसतानाही आपत्कालीन संपर्क साधता येईल.
केंद्र शासनाने २०२९ पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून अमली पदार्थांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई आणि व्यापक जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
हाय जंप प्रकारात सर्वेशने सुरुवातीपासून आपले वर्चस्व ठेवले होते. 2.05 मीटर, 2.10 मीटर आणि 2.15 व 2.20 मीटर प्रकारात पहिल्याच उडीमध्ये यश प्राप्त केले. त्यानंतर त्याने 2.25 मीटरच्या प्रकारात तिसऱ्या…
कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या अद्वितीय शौर्याचे स्मरण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद कुटुंबीयांना राज्य सरकारचा कायम पाठिंबा असल्याचे सांगितले. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही त्यांनी भर दिला.
Devendra Fadnavis on Central Goverment: देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार का? या चर्चांवर स्वतः फडणवीसांनी पूर्णविराम लावला असून मी मुंबईतच राहून महाराष्ट्राची सेवा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. तसेच पेपरफुटीविरोधात जगातील सर्वात कडक कायदा आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, CJP ने सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचा दावा करत जंतर-मंतरवरील आंदोलन मागे घेण्याची घोषणा…