राज्यात शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) या केवळ योजना नसून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची मोठी चळवळ असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी नमूद केले.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत संपूर्ण देशात आणि राज्यात गॅस सिलेंडरचा विस्कळीतपणा झाल्याने प्रत्येकजण हवालदिल झाला आहे. जो तो पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.
गारपिटीनंतर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर बरोबरच युरिया खताची टंचाई जाणू लागली आहे. आंबेगाव तालुक्यात कृषी खात्याच्या अनेक दुकानांमध्ये युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये १८ व १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राहुल कुल यांनी दिले आहेत.
सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि स्थानिक पातळीवरील वाढलेली आवक यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
यंदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय अधिकच कठीण बनत आहे.
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर एकूण ४ हजार ४८९ कोटी १४ लाख रुपयांची एफआरपी देय होती. त्यापैकी मोठा हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला असला तरी शेकडो कोटींची रक्कम अजूनही थकीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी…
पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असताना अॅग्रीस्टॅक (शेतकरी ओळख क्रमांक) योजनेत नाव नोंदणी न केलेल्या सुमारे ६१ हजार शेतकऱ्यांवर आता प्रशासनाची नजर असणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने शेतीपिकांना ताण बसू लागला आहे. परिणामी, या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.