२०२५–२६ या वर्षात कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांतील ८५ तुती बीजकोष उत्पादक रेशीम शेतकऱ्यांकडून ६९४१.८०० किलो बीजकोषांची खरेदी करण्यात आली असून, त्यासाठी ८८,५७,३५५ रुपये अदा करण्यात येणार आहेत.
लोणी काळभोर परिसरात ऊस जळीत घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या २४ तासांत दुसरी गंभीर घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली असून अद्याप नुकसान भरपाई, रब्बीच्या पेरणीसाठी अनुदान सुद्धा सरकारकडून मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Farmers News in Marathi : शेतकऱ्यांची सोय आणि तांत्रिक बाबींचा विचार करून प्रशासनाने नोंदणीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतवाढीमुळे अद्याप नोंदणी न करू शकलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा…
नोंदणी करताना कोणताही गैरप्रकार, चुकीची माहिती किंवा बोगस नोंदणी आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची असणार आहे. दोषी आढळणाऱ्या संस्थांवर कडक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
MNREGA Workers News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (मनरेगा) अमरावती जिल्ह्यात मजुरांच्या मजुरीसह साहित्याचा मोठा निधी शासनाकडे थकीत असल्याचे चित्र आहे.
शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता की बहुतेक पेंढा जाळण्याचे प्रमाण दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान होते. या वेळी नासाचे उपग्रह, विशेषतः MODIS सारखे सेन्सर पृथ्वीचे निरीक्षण करतात आणि आगीचा डेटा…
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत, त्यांच्या स्वखर्चातून आणलेल्या १०१ उत्तम प्रतीच्या देशी गीर गाईंचे वितरण रविवारी १४ नोव्हेंबर रोजी सद्गुरू सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.
ऊस बिलातून बँकांकडून सुरू असलेली कर्जवसुली तत्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.
वनपुरी परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने वन विभागाने तातडीने पिंजरा बसविला आहे.
थकीत एफआरपीची रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे.
राज्यस्तरावर महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभा क्षेत्रस्तरावर स्थानिक विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच मिळणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत उसाला अवेळी तुरे फुटू लागल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. तुरे येऊ लागल्याने वजनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानाची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
शेतकरी संघटनांनी उड्डाणे रद्द केल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून नुकसानभरपाई, तसेच अशा परिस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील एअरलाइन्समार्फत तातडीने पर्यायी उड्डाणे उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नाहीत तर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.