Farmer Protest News: कांद्याच्या घसरलेल्या दरांविरोधात पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आत्तापर्यंत ७ गावांतील शेतकऱ्यांकडून ९२० एकर जमिनीसाठी संमतीचे करारनामे झाले आहेत.
माण-खटाव तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईविरोधात शेतकरी आणि नागरिकांनी ४१ अंश तापमानात आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. म्हसवड येथे झालेल्या या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येत असून भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे.
व्यापारी, संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच इतर संबंधित घटकांनी आवश्यक परवानगीशिवाय शेतमाल व्यापार करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
४०० केव्ही हाय व्होल्टेज लाईन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प मोबदल्यात घेतल्या जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांत गप्प केले जात असल्याचे समोर आलं आहे.
शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले, अनिल घनवट, कैलास तवार यांनी देखील उसाच्या एफआरपीमध्ये केवळ शंभर रुपये वाढ, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचे म्हटले आहे.
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकूण ४० हजार कोटी रुपयांच्या एफआरपी देयकांपैकी तब्बल ३८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
मंत्रीपुत्र साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. उलट शेतकऱ्यांवरच आरोप होत असल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्यातील साखर उद्योगाला आर्थिक उभारी देण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावांपैकी ७ साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) मोठा दणका दिला आहे.
धाराशिव तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे या तलावातील माती आणि मुरूम उत्खनन करण्यासाठी स्थानिक माफियांनी सपाटा लावला आहे.
पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने पुणे जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत.