सतेज पाटील यांनी राज्यात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
कोल्हापूर : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत पूर्ण माहिती दिली आहे. मात्र हा महामार्ग सुरुवातीपासून चर्चेमध्ये आला आहे. यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. यावर आता कॉंग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणातील विविध मुद्द्यांवर बोलताना नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गावर राज्यपालांनी केलेल्या उल्लेखावर विचार मांडले. यावेळी बोलताना, “प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधत असल्याचा भास सरकार निर्माण करत असून त्यासाठी समृद्धीमार्गाचे उदाहरण दिले. या महामार्गावर जो टोल मिळणे अपेक्षित होता तो मिळाला नाही तरीही नविन शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प कशासाठी ? 86 हजार कोटी रूपये खर्चून होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गातून टोल वसूल करण्यासाठी 3 हजार दरवर्षी याप्रमाणे किमान 28 वर्ष लागतील आणि यासाठी दरवर्षी 60 लाख वाहने या रस्त्याने गेली पाहिजेत,ठ अशी वस्तुस्थिती मांडली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याऐवजी नागपूर- गोवा महामार्गावर जी जी शक्तीपीठे येणार आहेत त्या मंदिराच्या विकासासाठी 5- 5 हजार कोटी रुपयांचा निधी देऊन त्यांचा विकास करावा अशी मागणी केली. त्यामुळे शक्तीपीठांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सुखसोयी उपलब्ध करून तिर्थक्षेत्रांचा विकास साधला येईल असेही सुचवले.
शक्तिपिठाच्या अट्टाहासाखातर राज्यातील 27 हजार शेतकऱ्यांना उघड्यावर टाकू नका अशी आर्जव करताना शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा वटहुकुम सरकारने काढला असाताना पुन्हा तो राबवला जात आहे ही नागरीकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक नाही काय ? असा अशी विचारणाही सभागृहात केली. शेवटी, राज्यभरात शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे तरीही राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये हा विषय येतो हे दुर्दैव असून त्याविषयी खेद व्यक्त केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शक्तीपीठ महामार्गामुळे होणाऱ्या विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये मागिती दिली आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरहून सुरू होणार असला तरी त्याची खरी सुरुवात वर्ध्याच्या सेवाग्राम समृद्धी महामार्गावरून होईल. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून माहूर, कोल्हापूर, तुळजापूर, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, पंढरपूर, कारंजा लाड, गाणगापूर, नरसोबाची वाडी आणि औदुंबर दत्तगुरुंची स्थाने यासारखी अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे जोडली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. हा महामार्ग केवळ पर्यटनासाठी नसून तो मराठवाड्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना देणार आहे. विशेषतः मराठवाड्यातून हा महामार्ग मोठ्या प्रमाणावर जाणार असून कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला मध्य भारताशी जोडण्याचे काम तो करेल. शक्तीपीठ महामार्ग, कोकण द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यांचा त्रिकोण तयार करत असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.