बारामती शहर हे औद्योगिक, शैक्षणिक व कृषी दृष्ट्या महत्त्वाचे ठरत असले तरी गेल्या काही वर्षांत शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढलेली वाहनसंख्या ही मोठी समस्या ठरत आहे.
ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजातील भोंगळ कारभार सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी उघड केला आहे. 17ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट दाखवून दिले की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या एसओपी (SOP) नियमांचे…
पुन्हा एकदा नागलाबंदर भागात नागरिकांनी एकत्र जमून आंदोलन केले. आंदोलकांनी काहीवेळासाठी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी आणि स्थानिकांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. गेले कित्येक दिवस या वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळलेल्या स्थानिकांना आणि प्रवाशांना आता यातून दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
अजित पवार यांनी आज वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौकात पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांना कडक शब्दांत फटकारले आणि वाहतूक तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश दिले.
महमार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे. गणेशोत्सवाचा सण तोंडावर आला असताना देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांचा सामना करूनच रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
वाहतूक प्रकल्पांपैकी महत्वाचा कारासवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यवस्तीसह इतर भागात तात्पुरता वाहतूकीत बदल केले असून, गुरुवारी (दि १९) रात्री दहा ते सोमवारी (दि २३) रात्री अकरा वाजेपर्यंत हा बदल असणार आहे.
ठाण्यातील काही नागरिकांच्या टोईंगबाबतच्या तक्रारी व मागणीनुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतून रत्नागिरीला आता फक्त ४ तासांमध्ये पोहोचता येणार आहे. केंद्र सरकारने हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाला हिरवा कंदील दाखवला असून हा मार्ग कोकणासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर…
सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रहदारीसाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशातच आता कल्याण पूर्वेतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या चक्की नाका येथे मागील काही दिवसांपासून सिग्नल बंद अवस्थेत आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून शहरात वाहतूक नियमनासाठी सिग्नल यंत्रणा बसवली जाते आहे. त्यासाठी शहरातील चौकांची स्वच्छता आणि जागा उपलब्ध करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोहिम सुरू आहे.
मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना व मालवाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी पुणे महापालिकेने विमानतळ क्षेत्र एकात्मता आराखड्यासह नगर रस्त्याचा सर्वंकष मोबिलिटी प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात प्रथमच मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वाहतूक नियंत्रणासाठी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित प्रणाली कार्यान्वित केली आहे.
मुंबईमधील वाढत्या वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवाशांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिग्नलची वाढती वेळी ही रिक्षा चालकांसाठी व प्रवाशांसाठी डोके दुखी ठरत आहे.