यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. युवतीसह अन्य दोघांनी बेदम मारहाण करत कपडे फाडल्याने एका चाळीस वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याने विष प्रश्न करून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव संदीप जयवंतराव नारनवरे असे आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
संदीप लागवडीसाठी बियाणे खरेदी करून आपल्या घाटंजी गावाकडे परत येत असतानां वळणावर एका मित्रांसोबत बोलत उभा राहिला. पण मित्राच्या बाजूलाच उभ्या असलेल्या एका युवतींसह अन्य दोघांनी बेदम मारहाण करत कपडे फाडले. याबाबतची माहिती मिळताच, त्याचा लहान भाऊ तिथे आले. लहान भावाने मोठ्या भावाला घरी परत नेले.मात्र, दुसऱ्याचदिवशी हा अपमान सहन न झाल्याने युवा शेतकऱ्याने शेतात जाऊन विष प्राशन केले. बियाणे खरेदी करुन गावाकडे परत येताना पांढुर्णा ते यवतमाळ बायपास रोडवर ही मारहाणीची घटना घडली होती. तर, सीमरन पाटील (20), करण गौतम पाटील दोन्ही रा.चोरंबा, प्रशांत चौधरी रा. घाटंजी अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
कुटुंबीयांचा आरोप?
युवतींसह तिच्या दोन सहकाऱ्यांनी मारहाणी केल्यामुळे संदीपने जीवन संपवल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. संदीपने विष प्राशन केल्यानंतर त्याला उपचारासाठी घाटंजीच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
याप्रकरणी, पोलिसांत गुनाहे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लहान भाऊ मंगेश नारनवरे याने घाटंजी पोलिसात फिर्याद दिली. आपला भाऊ संदीप नारनवरेला सीमरन पाटील, करण पाटील, प्रशांत चौधरी या तिघांनी मारहाण करून अपमानित केल्यानेच त्याने आत्महत्या केली असून, ते आपल्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, अशी फिर्याद संदीपच्या भावाने दिली होती. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी विविध कलमान्वये तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
Accident News : मोशी-चाकण मार्गावर भीषण अपघात; भरधाव कारने 2 जणांना उडवले