(फोटो सौजन्य – Pinterest)
भारत त्याच्या निसर्गसौंदर्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. येथील प्रत्येक जागा स्वतःमध्ये खास आहे. येथे समुद्राच्या लाटा तसेच आकाशाला भिडणारी पर्वतशिखरे आहेत. अनेकांना पर्वत पाहायला फार आवडतात. पर्वतांच्या ठिकाणी शांततामय वातावरणाचा अनुभव घेता येतो. येथील सौंदर्यही मनाला भिडून जाते, ज्यामुळे बहुतेक लोक आपल्या सुट्टीत पर्वतांना भेट देण्याचा प्लॅन करतात. विशेषतः भारतात, पर्वतांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा या पर्वतांवर दैवी शक्ती जाणवते तेव्हा हे महत्त्व आणखी वाढते. भारतात असे अनेक पर्वत आहेत, जिथे अजूनही देवांचे वास्तव आहे, असे मानले जाते. अशा परिस्थितीत, आज या लेखात आम्ही तुम्हाला देशातील अशा काही पर्वतांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही देखील दैवी शक्तींचा अनुभव घेऊ शकता.
भारताचे मिनी स्वित्झर्लंड, इथे फक्त भारतीयांना आहे फिरण्याची परवानगी; परदेशांना प्रवेश नाही
गोवर्धन पर्वत
वृंदावन जवळील गोवर्धन पर्वताचे नाव सर्वांना माहित आहे. हा एक असा पर्वत आहे ज्याची उंची फारशी उंच नाही, पण तो दूरवर पसरलेला आहे. हा पर्वत भगवान इंद्राच्या क्रोधाचा आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाचा पुरावा आहे. खरंतर, असे मानले जाते की जेव्हा पर्जन्यदेवता इंद्रादेवाने वृंदावनातील लोकांना शिक्षा करण्यासाठी वादळ आणि पाऊस धर्तीवर पाठवला, यावेळी कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वताला उचलले आणि त्याखाली असलेल्या सर्वांना सात दिवसांसाठी आश्रय दिला. आजही लोक भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी या पर्वताला प्रदक्षिणा घालतात.
त्रिकुटा पर्वत
त्रिकुट पर्वताबद्दल ऐकताच आपल्या मनात वैष्णो देवीचा दरबार येतो. कटरा येथील हा पर्वत वैष्णो देवीचे घर मानले जाते. हे असे ठिकाण आहे जिथे माता राणी राहतात आणि दूरदूरहून तिच्या भक्तांना आकर्षित करतात. येथे पोहोचण्यासाठी भाविकांना १२ किमीचे कठीण अंतर चढावे लागते, परंतु देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि तिची उपस्थिती जाणवण्यासाठी लोक हा कठीण मार्गदेखील पार करतात.
कैलास पर्वत
कैलास पर्वत हे हिंदू, बौद्ध, जैन आणि बॉन अनुयायांच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते. तिबेटाच्या पठारावर हे पर्वत वसले आहे . कैलास पर्वताला स्वर्गची उपमा दिली आहे. खरं तर, हा पर्वत भगवान शिवाचे निवासस्थान आहे. लोक परमेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे चढत नसले तरी, ते त्याभोवती परिक्रमा करतात. हा ५२ किलोमीटरचा प्रवास आयुष्यभराची कर्मे शुद्ध करतो असे मानले जाते. या पर्वताची एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळते असा लोकांचा समज आहे.
पार्वती व्हॅली
नावाप्रमाणेच, हा पर्वत भगवान शिवाशी देखील संबंधित आहे. असे म्हटले जाते की पार्वती व्हॅली ही अशी जागा आहे जिथे भोलानाथांनी हजारो वर्षे ध्यान केले होते. आजही तुम्हाला येथे ती चमक आणि शांतता जाणवेल. दूरदूरवरून लोक इथे या ठिकाणाचे सौंदर्य आणि शांतता प्राप्त करण्यासाठी येतात.